Share

पुरेशा लससाठ्या अभावी उद्यापासून तीन दिवस मुंबईत लसीकरण बंद

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोनाशी सामना करण्यासाठी लसीकरण हे सर्वात महत्त्वाचे साधन आहे. लसीकरणात महाराष्ट्राने आघाडीही घेतली आहे. राज्यात १.५ कोटी पेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. मात्र, लस उपलब्ध करुन देण्यावरुन केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात कायमच मतभेद असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये कायमच आरोप-प्रत्यारोप सुरू असतात.

राज्याला देशात सर्वाधिक लसी उपलब्ध करुन देण्यात आल्या असल्यामुळेच राज्यात सर्वाधिक लसीकरण झाले असल्याचा दावा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मात्र, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकार लस उपलब्ध करुन देण्याबाबत आखडता हात घेत असल्याचे म्हटले आहे. यात आता पुन्हा लसीचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे मंबईत तीन दिवस लसीकरण बंद राहणार असल्याचे मुंबई महानगर पालिकेने जाहीर केले आहे.

या संदर्भात मुंबई महानगर पालिकेच्या वतीने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकण्यात आली आहे. यामध्ये मुंबईत पुढील तीन दिवस लसीकरण बंद राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच १८ वर्षावरील नागरिकांचे नियोजित लसीकरण विलंबाने सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर ४५ वर्षावरील नागरिकांना खात्रीपूर्वक लस मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यात लसीकरण केंद्राबाहेर गर्दी न करण्याचे आवाहनही मुंबई महानगर पालिकेने केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!