मुंबई: आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आग्रातील मुघल संग्रहालयाचे नामकरण करून ‘छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय’ ठेवल्यावर आता महाराष्ट्रात राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर टिका करताना ‘उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री महाराजांचा जयजयकार करतात तर महाराष्ट्राचे सत्ताधारी महाराजांच्या वंशजांकडे पुरावे मागतात’ असं म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट करून शिवसेनेवर टिका केली आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांना महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे द्यावे अशी टिका केली होती. आता यावरून राजकारण सुरू झाले आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी शिवाजी महाराजांचा जय जयकार करत आहेत..
आणि
महाराष्ट्रातील सत्ताधारी महाराजांच्या वंशजाकडे पुरावे मागतात..
दुर्देव्य ते आमचे !— Nitesh Rane (@NiteshNRane) September 15, 2020
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आग्र्यातील मुघल संग्रहालयाचे नामकरण करून छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय असे केले आहे. जेव्हा पासून योगी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यापासून ते वेगवेगळ्या सार्वजनिक ठिकाणांचे नावं बदलत आहे. मुघलांची ओळख आम्हाला नकोय आणि आम्हाला आमच्या संस्कृतीवर गौरव आहे, असं योगींनी म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांंचा अपमान करून त्यांना कैद केले होते त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या शिताफीने ‘आग्र्याहून सुटका’ करून घेतली होती.आता या नामकरणामुळे महाराष्ट्रात आनंद व्यक्त केला जात आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या संस्कृतीच्या उत्थानासाठी अनेक पाऊले उचलली आहेत. बहुमताने भाजप सरकार आल्यानंतर त्यांनी राज्यात मोठे निर्णय घेतले आहेत. त्यांच्या अशा कारभारावर माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव,माजी मुख्यमंत्री मायावती यांनी नेहमीच विरोध केला आहे. त्या विरोधाला न जुमानता मुख्यमंत्री योगींनी अनेक स्थानांचे नामकरण केले आहेत.
दरम्यान याआधी त्यांनी फैजाबाद जिल्ह्याचे नामकरण ‘अयोध्या’ असं केलं होतं. मुघलसराय जंक्शनचे नामकरण ‘पंडित दिनदयाल उपाध्याय जंक्शन’ तर अलाहाबाद शहारचं नाव ‘प्रयागराज’ असं केलेलं आहे. आता अलिगढ जिल्ह्याचे नावसुद्धा बदलावं अशी मागणी होत आहेत. आता त्यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काय निर्णय घेतात हे बघणं महत्त्वाचं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- आग्र्यातील मुघल संग्रहालय आता छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय,योगी आदित्यनाथांची घोषणा
- मुंडे साहेबांचा अचानक मृत्यू झाला तेव्हा भाजपाला सीबीआय चौकशी करावी असे का वाटले नाही ?
- स्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी गोंदियातील नेत्यांनी घेतली ‘या’ मंत्र्याची भेट
- ‘कांदा निर्यात बंदी उठलीच पाहिजे’; वडनेरच्या शेतकऱ्यांचा सरकारच्या निर्णयाची होळी करून जाहीर निषेध
- नोव्हेंबर अखेरपर्यंत अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार : तंत्रशिक्षण मंत्र्यांची माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

