मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत आणि राज्य सरकार यांच्यात झालेला वाद हा चांगलाच पेटला होता. अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर कंगणारे मुंबई पोलिसांच्या तपासासह राज्य सरकारवर ताशेरे ओढले होते. यानंतर हा वाद शिवसेना विरुद्ध कंगना असा झाला होता. हा वाद इतका विकोपाला गेला की कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख देखील केला.
यानंतर, कंगनाला मुंबईत पाय ठेवू देणार नाही अशी भूमिका शिवसेनेनं घेतली होती. मात्र, शिवसेनेच्या आव्हानाला ललकारत ती याआधीच मुंबईमध्ये येऊन गेली होती. रविवारी अभिनेत्री कंगना रानौत पुन्हा मुंबईत परतली आहे. मुंबईत परतल्यानंतर आज कंगनाने श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी कंगना हिरवी साडी, नाकात नथ आणि केसात माळलेला गजरा अशा पारंपारिक मराठमोठ्या वेषात आली होती.
‘सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर कंगना रानौतने मोठ्या उत्साहात हसतखेळत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मला मुंबईत राहण्यासाठी केवळ गणपती बाप्पाच्या परवानगीची गरज आहे. मी इतर कोणाकडेही परवानगी मागितली नाही,’ असं म्हणत कंगनाने शिवसेनेला पुन्हा डिवचलं आहे. दरम्यान, नुकतंच शिवसेनेत प्रवेश केलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने कंगनाला खोचक टोला लगावला आहे.
The amount of hostility I faced for standing up for my beloved city Mumbai baffled me, today I went to Mumba devi and Shri Siddhivinayak ji and got their blessings, I feel protected, loved and welcomed. Jai Hind Jai Maharashtra ???? pic.twitter.com/sxT583P5w2
— Kangana Ranaut (@KanganaTeam) December 29, 2020
कंगनाने मराठमोळ्या वेशातील फोटो ट्विटरवर शेअर करतानाच, ‘मला माझ्या प्रिय मुंबईसाठी उभं राहताना अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागलं. आज मी मुंबा देवी आणि श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन सुरक्षित व चांगली भावना अनुभवली आहे’ असं कॅप्शन शेअर केलं आहे. यावरूनच उर्मिलाने, ‘माझ्या प्रिय मुंबईसाठी उभं राहणं?’ असे तिचेच वाक्य म्हणत ‘पुढे बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का हो भाऊ…’ अशी खिल्ली उडवली आहे.
“for standing up for my beloved city Mumbai “ ????????????
बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का हो भाऊ…????????????— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) December 29, 2020
महत्वाच्या बातम्या
- शिवसेनेचा भाजपला जबर धक्का; नवी मुंबईतील मातब्बर नेते बांधणार शिवबंधन
- ‘या’ भाजप नेत्याने देशाच्या तिरंग्याचा घोर अपमान केलाय! आता देशद्रोहाचा गुन्हा का दाखल करू नये?
- काँग्रेस-शिवसेनेतील धुसफूस शमणार? महाविकास आघाडीतील समन्वय समितीची महत्वाची बैठक
- ग्रामपंचायत : इच्छूकांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी धनंजय मुंडेंचा पुढाकार
- ‘मुंबईत महापौर बनवायला काँग्रेसकडे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि काही मतदार शिल्लक राहिलेत का?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

