🕒 1 min read
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही तळीयेनंतर आज चिपळूणकडे रवाना झाले आहेत. चिपळूणमधील परिस्थितीचा ते आढावा घेणार आहेत. त्याचबरोबर केंद्रीय अवजड उद्योगमंत्री नारायण राणे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे देखील कोकण दौऱ्यावर आहेत.
गेल्या चार दिवसात राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे कोकणातील अनेक भागात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. चिपळूण, महाड, खेड तालुक्यात महापूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. याची पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी भाजप नेत्यांनी कौकण दौरा आखला आहे.
माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, प्रवीण दरेकर हे कोकणच्या पूरग्रस्त भागातील पाहणीसाठी आज सकाळी मुंबई विमानतळावरून रवाना झाले.#MaharashtraFloods #KonkanFloods #HeavyRains pic.twitter.com/Ze5uFKhtdq
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) July 25, 2021
नारायण राणे यांनी कोकणमधील पूरग्रस्त आणि दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी जात असल्याचे सांगितले. त्यांनी ट्विट केले की, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संमतीने मी, देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांच्यासह रायगड जिल्ह्यातील तळये, रत्नागिरीतील चिपळूण येथील दुर्घटनाग्रस्त परिसराची पाहणी करण्यासाठी रवाना होत आहोत.
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संमतीने मी, देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांच्यासह रायगड जिल्ह्यातील तळये, रत्नागिरीतील चिपळूण येथील दुर्घटनाग्रस्त परिसराची पाहणी करण्यासाठी रवाना होत आहोत.@PMOIndia
— Narayan Rane (@MeNarayanRane) July 25, 2021
मुख्यमंत्री चिपळूण दौऱ्यावर
सकाळी १० वाजता मुंबईहून हेलिकॉप्टरने ते चिपळूणसाठी रवाना झालेत. गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथे आरजीपीपीएलच्या एमआयडीसी हेलिपॅड येथे ११ वाजता ते पोहोचले. त्यानंतर ते वाहनाने चिपळूणकडे रवाना झाले. दुपारी १२.२० वाजता चिपळूण येथे आगमन होऊन नंतर ते मदत व बचाव कार्याची पाहणी करतील. त्यानंतर ते दुपारी २.४० वाजता अंजनवेलहून हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना होणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री ठाकरे आज चिपळूण दौऱ्यावर, पूर परिस्थितीची करणार पाहणी
- अखेरचा सामना गमावूनही प्रशिक्षक राहुल द्रविडचे ‘या’ कारणासाठी होत आहे कौतुक
- मिलरच्या नाबाद खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेची आर्यलँडवर ४२ धावांनी मात
- ‘कौरव आणि भाजप नेत्यांची भाषा एकच.. शेवट आपल्याला माहितीच आहे’
- बचावकार्याचा वेग वाढवून राज्य सरकारने पूरग्रस्तांना आर्थिक मदत करावी – आठवले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
