Share

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवारांची अहमदनगर घटनेची दाखल

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर : अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भीषण आग लागून 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या विभागात कोरोनाबाधित 17 रुग्ण उपचार घेत होते. दरम्यान, या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनीही अहमदनगर दुर्घटनेची पाहणी केली.

या दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, असं भारती पवार म्हणाल्या आहेत. ऐन दिवाळीत संपूर्ण नगर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. रुग्णालयातील अतिदक्षता विभागालाच ही आग लागली. शॉटसर्किमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. अहमदनगर जिल्हा रुग्णालयालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या भीषण आगीत 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून मृतांच्या कुटुंबीयांना एकुण ७ लाखांची मदत मिळणार आहे. भारती पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रकरणाची माहिती घेतली. या घटनेत जखमी झालेल्या रुग्णांची भेट घेतली. तसेच या प्रकरणावरून आपण केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांच्याशी बातचीत केली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!