मुंबई: क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी चर्चेत आलेले एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्याकडून ड्रग्ज प्रकरणाचा तपास काढण्यात आला असल्याची चर्चा होती. त्यावरच समीर वानखेडे यांनी स्पष्टीकरण देत म्हटले आहे की, आर्यन खान केस प्रकरणाचा तपास माझ्याकडून काढून घेण्यात आला नाही. या संबंधी मीच न्यायालयात एक रिट पीटिशन दाखल केली होती आणि या प्रकरणाचा तपास केंद्रीय संस्थेकडून करण्यात यावा अशी मागणी केली होती. त्यामुळे आर्यन खान आणि समीर खान यांच्या प्रकरणाचा तपास आता दिल्लीतील केंद्रीय तपास यंत्रणेच्या एसआयटी कडून करण्यात येणार आहे. त्यामुळे हा तपास आता एनसीबीच्या दिल्लीतील आणि मुंबईतील टीममध्ये समन्वयाने करण्यात येणार असल्याचे वानखेडे यांनी म्हटले आहे. मात्र वानखेडे यांच्या स्पष्टीकरणाचे राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी खंडन केले आहे.
एकतर एएनआय समीर वानखेडे यांचा चुकीचा उल्लेख करत आहे किंवा समीर वानखेडे देशाची दिशाभूल करत आहे. खंडणी व भ्रष्टाचाराचा तपास सीबीआय किंवा एनआयए मार्फत करण्यात यावा, मुंबई पोलिसांकडून नव्हे अशी याचिका वानखेडे यांनी कोर्टात दाखल केली असल्याची माहिती खोटी आहे. तर न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे देशाला सत्य कळले पाहिजे. असे ट्वीट नवाब मलिक यांनी केले आहे.
Either @ANI is misquoting Sameer Wankhede or he is misleading the Nation.
He filed a writ petition in court asking the investigation on him for extortion & corruption should be conducted by CBI or NIA, not by Mumbai Police.
Court rejected his petition.
Nation must know the truth https://t.co/rVO0tPDjDf— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 5, 2021
दरम्यान समीर वानखेडेंकडून काढून घेण्यात आला आहे. दिल्लीहून आज सहा अधिकारी येणार असून प्रत्येक अधिकारी वेगवेगळ्या प्रकरणाचा तपास करणार आहे. दिल्लीतील एनसीबीचे अधिकारी संजय कुमार सिंग हे सुद्धा आज मुंबईत येणार आहेत. संजय सिंग हे आर्यन खान प्रकरणाचा तपास करणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
- भारतीय संघावर टीका करणाऱ्यांना जडेजाने सुनावले, म्हणाला..
- कुत्र्यासारखं भुंकण्यापेक्षा भाडखाऊ गुलाबाने कव्वाली गात राहावी-नितेश राणे
- मराठी माणसाच्या भरवश्यावर राजकारण करायचे आणि तो संकटात आल्यावर त्याला उघड्यावर सोडायचे – गोपीचंद पडळकर
- ‘…तर डोक्याविना संजय राऊत दिसतील तिथे’, नारायण राणेंचा खोचक शब्दांत इशारा
- समीर वानखेडेंनी आर्यन खानचं अपहरण केलं; मलिकांचा गंभीर आरोप


