नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने २०२१ हंगामासाठी सुक्या खोबऱ्याच्या किमान आधारभूत किंमतीला (एमएसपी) मान्यता दिली आहे. तेल काढण्याच्या घाणीसाठी उपयुक्त उत्तम सरासरी गुणवत्ता (एफएक्यू) असलेल्या खोबऱ्याच्या एमएसपी मध्ये ३७५ रुपये वाढ करण्यात आली आहे जी २०२० च्या प्रति क्विंटल 9960 रुपयांवरून वाढवून २०२१ हंगामासाठी १०३३५ रुपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे.
अख्ख्या नारळासाठी २०२० हंगामात असलेला १०,३०० रुपये प्रति क्विंटल किमान आधारभूत किंमत ३०० रुपयांनी वाढवून २०२१ हंगामात १०,६००/ – रुपये प्रति क्विंटल करण्यात आला आहे. अखिल भारतीय सरासरी उत्पादन खर्चापेक्षा घोषित झालेला किमान आधारभूत किंमत खोबऱ्यासाठी ५१.८७ टक्के आणि अख्ख्या नारळासाठी ५५.७६ टक्के परतावा मिळवून देतो.
कृषी खर्च व मूल्य आयोगाच्या (सीएसीपी) शिफारसींवर आधारित ही मंजुरी आहे.सरकारने २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात जाहीर केल्यानुसार सन २०२१ च्या हंगामात खोबऱ्यासाठी किमान आधारभूत किंमतीमधील वाढ अखिल भारतीय सरासरी उत्पादन खर्चाच्या किमान पट १.५ पातळीवर एमएसपी निश्चित करण्याच्या तत्त्वानुसार आहे.२०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने किमान ५० टक्के नफा सुनिश्चित करणे हे महत्त्वपूर्ण आणि प्रगतिशील पाऊल आहे.
भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ लिमिटेड (नाफेड) आणि भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघ (एनसीसीएफ) हे नारळ उत्पादक राज्यांतील एमएसपी आधारभूत कार्ये करण्यासाठी केंद्रीय नोडल एजन्सी म्हणून काम करत राहतील.सन २०२० च्या हंगामात सरकारने ५०५३.३४ टन नारळ आणि ३५.५८ टन खोबऱ्याची खरेदी केली असून त्याचा फायदा ४,८९६ नारळ उत्पादकांना झाला.
महत्वाच्या बातम्या
- महाभारताचा उल्लेख करत काँग्रेस नेत्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र
- मुंबई लोकल २९ जानेवारी किंवा १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी सुरु होण्याची शक्यता – महापौर
- प्रजासत्ताक दिनी ‘महाराष्ट्र देशा’च्या औरंगाबाद कार्यालयाचे शानदार उद्घाटन
- शिवसेनेचा भाजपला आणखी एक धक्का; भाजपच्या माजी सचिवाने मातोश्रीत बांधलं शिवबंधन !
- शेतकरी आंदोलन फुटीच्या उंबरठ्यावर ? व्ही एम सिंह यांच्या गटाची आंदोलनातून माघार


