मुंबई: नरक चतुर्दशीनिमित्त सर्वच राजकीय पक्षाकडून देशवासियांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हटके शुभेच्छा दिल्या आहेत.
नरकासुराचा वध करणाऱ्या भगवान श्रीकृष्णाची आठवण म्हणून नरकचतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नानानंतर कारीट फोडण्याची प्रथा आहे. . नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात समस्त देशवासियांनी धीर आणि संयम बाळगत असुररुपी कोरोनावर असाच विजय मिळवला आहे. सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा असे ट्वीट चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
नरकासुराचा वध करणाऱ्या भगवान श्रीकृष्णाची आठवण म्हणून नरकचतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नानानंतर कारीट फोडण्याची प्रथा आहे. मा.श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वात समस्त देशवासियांनी धीर आणि संयम बाळगत असुररुपी कोरोनावर असाच विजय मिळवला आहे. सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ! pic.twitter.com/UiDoAfJvJ6
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) November 4, 2021
तसेच नरकचतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध करून १६ सहस्त्र महिलांचे संरक्षण केले, म्हणूनच आजचा दिवस हा वाईटावर मांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. संरक्षणक्षेत्रात भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी मोदी सरकारने उचललेले पाऊल ऐतिहासिक असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- केंद्राने पेट्रोल-डिझेल शुल्क कपात केले, आता राज्य सरकारनेही जबाबदारी पार पाडावी – चित्रा वाघ
- T20 WC: भारतीय संघ अजूनही गाठू शकतो उपांत्यफेरी; जाणून घ्या कसं!
- केंद्राप्रमाणे राज्यात 5 व 10 रुपये कपात व्हायलाच हवी पण..; केशव उपाध्येंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- अजित पवार बनवाबनवी आणि फसवाफसवी थांबवा- किरीट सोमय्या
- मलिक पुन्हा करणार एक गौप्यस्फोट, ‘मिलते है रविवार को’ म्हणत दिला इशारा!


