🕒 1 min read
मुंबई: मोदी सरकारच्या नेतृत्वात सुरु असलेल्या प्रधानमंत्री उजाला योजनेमुळे आतापर्यंत भारतात ४८ अब्ज युनिट्सपेक्षा जास्त वीज बचत झाली असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. त्यांनी ट्वीट करत याबबत माहिती दिली आहे.
मोदी सरकारच्या नेतृत्वात सुरु असलेल्या प्रधानमंत्री उजाला योजनेमुळे देशातील गोरगरीब जनतेचे घर प्रकाशित होत आहे. या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात पथदिवे, ट्यूबलाइट आणि पंख्यांचे वितरण करण्यात आले आहे. याशिवाय आतापर्यंत भारतात ४८ अब्ज युनिट्सपेक्षा जास्त वीज बचत झाली आहे. अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
मोदी सरकारच्या नेतृत्वात सुरु असलेल्या प्रधानमंत्री उजाला योजनेमुळे देशातील गोरगरीब जनतेचे घर प्रकाशित होत आहे. या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात पथदिवे, ट्यूबलाइट आणि पंख्यांचे वितरण करण्यात आले आहे. याशिवाय आतापर्यंत भारतात ४८ अब्ज युनिट्सपेक्षा जास्त वीज बचत झाली आहे.????#PMUjala pic.twitter.com/u7HVJrH5SK
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) December 10, 2021
दरम्यान देशात आतापर्यंत ११ दशलक्षहून अधिक पथदिवे लावण्यात आले आहेत. तर राज्यात ८.५० लाखांहून अधिक पथदिवे लावण्यात आले आहेत. तर देशात ७२ लाखांहून अधिक ट्यूबलाईट वितरीत केले आहे. हीच संख्या राज्यात ५.३१ लाख आहे. तसेच २३ लाख पेक्षा अधिक पंखे देशभरात उजाला योजनेतून वितरीत करण्यात आले आहेत. अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी ट्वीट करत दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सरकार फक्त मेकअप व रंगसफेदी करीत असून प्रत्यक्षातले चित्र भेसूर’
- ३७८ दिवस अशा पद्धतीने चाललेला लढा जगात दुसरा झाला नसेल- संजय राऊत
- गांधी गोर्यांशी लढले, आम्ही चोरांशी लढू- नवाब मलिक
- ‘मुस्लिमांनी मशिदीत जाऊन नमाज अदा करावी,दर आठवड्याला मोकळ्या मैदानात एकत्र येणे चुकीचे’
- भाजपने ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्याच्या राजीनाम्याची केली मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
