🕒 1 min read
Uddhav Thackeray | मुंबई : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर भाष्य केल्यानंतर भाजप (BJP) पक्षाने शिवसेना (Shivsena) पक्षाला तसेच राहुल गांधी यांना धारेवर धरलं. यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात ज्यांचा कधीच सहभाग नव्हता, अशा मातृसंस्थांच्या पिल्लानी आम्हाला सावरकरांविषयी प्रश्न विचारू नये, असा घणाघात केला आहे.
सावरकरांचा मुद्दा उपस्थित केला हे बरं झालं. सावरकरांबद्दल आमच्या मनात प्रेम आहे. नितांत आदर आहे. ज्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नव्हता. अशा मातृसंस्थांच्या पिल्लांनी आम्हाला प्रश्न विचारावा हे दुर्देव आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
संघाला आता 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांचं स्वातंत्र्य लढ्यातील योगदान काय आहे? हे आधी सांगा. बाष्कळपणा बंद करा. आपल्या मातृसंस्थेचा स्वातंत्र्य लढयात भाग नव्हता त्यांनी आम्हाला प्रश्न विचारू नये. असं सांगतानाच निजामांच्या काळात हिंदूंवर अत्याचार होत होते. त्यावेळी तुमची मातृसंस्था कुठे होती? त्यांनी हिंदूंवरील किती अत्याचार थांबवले? असा सवालच त्यांनी केला.
महत्वाच्या बातम्या :
- ICC Ranks | टी 20 मध्ये पुन्हा भारतीय संघ आघाडीवर, विश्वचषक जिंकून इंग्लंड भारताच्या मागे
- Shinde vs Thackeray | “आधी मातोश्री पवित्र करावी” ; शिंदे गटातील आमदाराचा घणाघात
- Sanjay Raut | “राजकीय स्वार्थासाठी इतर नेत्यांना भारतरत्न दिला, मग…”, संजय राऊतांचा फडणवीसांना खोचक सवाल
- Alia-Ranbir Baby | आलिया-रणबीरच्या मुलीचे नाव ऐकून, आजी नीतू कपूर झाली भावूक
- Raosaheb Danve | “लाज वाटली पाहीजे” ; बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण करणाऱ्यांवर दानवे संतापले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
