औरंगाबाद : भाजप आणि शिवसेना यांची युती सुमारे दोन दशकांहून अधिकची होती. मात्र, गेल्यावर्षी विधानसभांच्या निकालानंतर काही मागण्यांवरून मतभेद झाल्याने शिवसेनेनं भाजपची साथ सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेससोबत जाऊन महाविकास आघाडीची सत्ता स्थापन केली. केंद्रातील एनडीएमधून देखील शिवसेनेनं बाहेर पडत मोदी सरकारचा पाठींबा काढून घेतला.
यानंतर, गेल्या वर्षभरात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात अनेक वाद सुरु असून भाजपने शिवसेनेला चांगलंच लक्ष्य केलेलं पाहायला मिळालं. मुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे उद्धव ठाकरे विराजमान असून भाजपने त्यांच्या कारभारावर चांगलीच आगपाखड केली होती. कोरोनाकाळापासून मुख्यमंत्री हे घरातच बसून मस्त तर जनता मात्र त्यांच्या प्रश्नांनी त्रस्त आहे अशी टीका भाजप नेत्यांनी केली होती.
आज औरंगाबादमधील नव्या पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी विरोधकांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी टीकांना प्रत्युत्तर दिलं आहे. ‘घरी बसून केलेल्या कामांचा शुभारंभ आणि भूमीपुजन आता होतेय. त्याची सुरवात औरंगाबाद म्हणून झाली,’ असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे. तर, ‘मला विकास कामांची घाई झाली आहे. औरंगाबादचा विकास वेगानं करायचा आहे. फक्त भूमिपूजन करुन कुदळ मारायला आलेलो नाहीये. काम पूर्ण करायला आलोय,’ असं आश्वासन देखील त्यांनी यावेळी जनतेला दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘ईडीला पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडलं हे हास्यास्पद!, अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार’
- सामन्यांच्या खिशाला कात्री, पेट्रोल नव्वदीपार!
- ‘पवार कधी शिवसेनेला तंगड वर करायला सांगतील आणि…’
- ‘आजही संकटात असलेल्यांना शरद पवारांमध्ये देवमाणूस दिसतो’
- डिसेंबरमध्येच लसीला परवानगी मिळेल, तर…; आदर पुनावालांनी केला मोठा खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
