🕒 1 min read
पुणे : गेले वर्षभर कोरोनाने जगात हाहाकार माजवला आहे. जवळजवळ सर्वच देशांत या कोरोनाचा शिरकाव झाला आणि लाखो लोकांना आपला प्राण गमवावा लागला. कोणतंच प्रभावी औषध नसल्यानं या रोगाची तीव्रता वाढली होती. या रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी जणू सर्व जगचं थांबल होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियासह हैद्राबाद व अहमदाबादमधील लस संशोधन करणाऱ्या कंपन्यांना भेट दिली होती. यानंतर, नेमकी लस कधी येणार? सर्वसामन्यांना परवडणार का? प्राधान्यक्रम कसा असेल? कितपत उपायकारक असेल? दुष्परिणाम असतील का? हे व असे कित्येक प्रश्न निर्माण झाले आहेत.
सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पुनावाला यांनी लवकरच खुशखबर मिळेल असे संकेत दिले आहेत. भारतातही तीन औषध कंपन्यांनी आपल्या कोरोना लशीला आपत्कालीन मंजुरी मिळावी यासाठी अर्ज केले आहेत. पुण्यातील सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया हि त्यापैकी एक संस्था आहे. सीरमनं ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेनका कंपनीसह मिळून ही लस तयार केली आहे. लशीच्या आपात्कालीन वापराला परवानगी द्यावी यासाठी DCGI कडे अर्ज केला आहे. याच वर्षाच्या अखेरपर्यंत ही मंजुरी मिळेल आणि पुढील वर्षाच्या पहिल्याच महिन्यात कोरोना लशीकरण सुरू होईल अशी माहिती त्यांनी दिली आहे.
ते म्हणाले, ‘आम्हाला इमर्जन्सी लायसेन्स चालू महिन्याच्या अखेरपर्यंत मिळेल; पण लशीचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यासाठीची परवानगी नंतर मिळेल. नियंत्रक यंत्रणेची परवानगी मिळाली, तर भारताचा कोरोना लशीकरण कार्यक्रम जानेवारी 2021 मध्ये सुरू होऊ शकतो, असा विश्वास आम्हाला आहे’ यासंदर्भात न्यूज १८ लोकमतने वृत्त दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘ईडीला पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडलं हे हास्यास्पद!, अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार’
- सामन्यांच्या खिशाला कात्री, पेट्रोल नव्वदीपार!
- ‘पवार म्हणजे महाराष्ट्राला वैचारिकदृष्ट्या ८०० वर्ष पुढे घेऊन गेलेलं महायुग’
- ‘आजही संकटात असलेल्यांना शरद पवारांमध्ये देवमाणूस दिसतो’
- ‘ठाकरे सरकार आल्या आल्या नाईट क्लबवाले त्यांच्या बापाचं सरकार असल्यासारखे वागू लागलेत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
