मुंबई : २०१९ विधानसभांच्या निकालानंतर शिवसेनेने भाजपसोबत असलेला संसार मोडून विसंगत विचारधारा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. यानंतर, हे तीनचाकी सरकार एकमेकांच्या पायात पाय अडकून पडेल असं भाकीत करून भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.
मात्र, आता या महाविकास आघाडी सरकारला वर्षपूर्ती झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने आज पत्रकार परिषदांचा धडाका लावत सरकारच्या वर्षपूर्तीच्या कारभाराला लक्ष्य केलं आहे. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन महाविकस आघाडी सरकारच्या कामगिरीचं काळ पुस्तक प्रकाशित केलं आहे.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामानाला दिलेल्या मुलाखतीवरून घणाघात केला आहे. त्यांनी केलेली विधानं, दावे, टीका यासंबंधी देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला आहे. ‘त्यांच्यावर टिपण्णी करण्याइतपत लायकीचे नाहीत’ अशी बोचरी टीका करतानाच त्यांनी, ‘या सरकारने फक्त स्थगितीच काम केल्याचा ‘ देखील आरोप केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘राष्ट्रवादी महाआघडीतून बाहेर पडणार नाही, भाजपने आता स्वत:च्या जीवावर सत्तेत येण्याची स्वप्ने बघावी’
- ‘माझ्यावर विष प्रयोग करणाऱ्या व्यक्ती बद्दल मला माहित होते’, लता दीदींचा धक्कादायक खुलासा
- मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची लढत चुरशीची होणार !
- ‘अशोक चव्हाण आणि अजितदादांचे फ्यूज उडाले नाही तर आमचे सरकार 20 वर्ष टिकेल’
- ‘गृहमंत्र्यांनी देश चालवायला हवा, अमित शाह छोट्या-छोट्या निवडणुका मॅनेज करण्यात व्यस्त’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

