मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील ‘अशक्यप्राय’ वाटणारी गोष्ट करुन दाखवली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण किंवा देवेंद्र फडणवीस यांनाही जे जमलं नव्हतं ते उद्धव ठाकरेंनी करुन दाखवलं. मंत्रालयात वर्षानुवर्षे एकाच जागी, ठाण मांडून बसलेल्या तब्बल ३०० अधिकाऱ्यांची फेरबदली केली आहे. हे अधिकारी अनेक वर्ष एकाच विभागात तळ ठोकून होते. त्यामुळे एखाद्या सचिवापेक्षाही जास्त ‘पॉवर’ हे अधिकारी दाखवत होते. टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील ३०० अधिकाऱ्यांची फेरबदली केली आहे. मंत्रालयातील अनेक अधिकारी वर्षानुवर्षे एकाच विभागात तळ ठोकून होते. ते केवळ खात्यांचे सचिवच नव्हे तर कॅबिनेट सदस्यांपेक्षाही अधिक प्रभावशाली झाले होते. कोणतेही कॅबिनेट सदस्य त्यांना बदलू शकत नव्हते. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर ते प्रशासनाच्या निदर्शनास आणण्यात आले. प्रदीर्घ विचारानंतर, मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत करून मंत्रालयातील ३०० अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.
यापूर्वी, देवेंद्र फडणवीस आणि पृथ्वीराज चव्हाण यांसारख्या माजी मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांमध्ये फेरबदल करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यामध्ये ते यशस्वी झाले नव्हते. आता उद्धव ठाकरे यांनी हे करुन दाखवलं आहे. त्यासाठी उद्धव ठाकरेंना मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी महत्त्वाची मदत केल्याचे सांगण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘खूप लवकर निघून गेलास…’; सिद्धार्थच्या जाण्याने मनोरंजन विश्वातून हळहळ व्यक्त
- ‘दरोडा घालणाऱ्या अनिल देशमुखांना पोलिसांनी अटक नाही, तर हार घालायचा काय?’
- शाळा सुरु करण्यासंदर्भात राज्य सरकारचा विचार सुरु; मुख्यमंत्री टास्कफोर्सशी चर्चा करुन घेणार निर्णय
- ‘उघड दार उद्धवा आता…’; मनसेचे मंदिरे उघडण्यासाठी पुण्यात जोरदार आंदोलन
- झोपेपूर्वी घेतलेल्या गोळ्यांनी केला अभिनेत्याचा घात? ; सिद्धार्थच्या मृत्यूबाबतच्या चर्चांना उधाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

