अमरावती : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील ईडी कारवाईवरून निशाना साधला आहे. दरोडा घालणाऱ्या अनिल देशमुखांना पोलिसांनी अटक नाही करायची तर मग काय हार घालायचा काय अशी खोचक टीका केली आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी मार्ग खुले असल्याचं सांगत आमच्या पाठीत खंजीरच खुपसला होता. असेही ते म्हणाले आहेत.
चंद्रकांत पाटील दोन दिवसीय अमरावती दौऱ्यावर आहेत, यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर निशाना साधला आहे. अनिल देशमुख यांच्यावर विनाकारण कारवाई चालू नाही असेही ते म्हणाले आहेत. तर त्यांनी घातलेली दरोडे यानंतर पोलिसांची कारवाईच होणार त्यांना हार घालून त्यांचे स्वागत तर नाही केले जाणार असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे.
यावेळी त्यांनी शिवसेना मुंबईत होती मात्र भाजपने अर्थातच प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी बोट धरुन शिवसेनेला मराठवाडा विदर्भात आणलं. त्यामुळे यंदा भाजप स्वबळावर लढणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करा; न्यायालयाची सरकारला कायदा करण्याचा सूचना
- गणेश मंडळांनी मतदार जनजागृती कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवावा; पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
- लवकरच भारतीय प्रेक्षकांच्या भेटीला जेम्स बाँड सिरीजमधील २५ वा चित्रपट
- ‘उघड दार उद्धवा आता…’; मनसेचे मंदिरे उघडण्यासाठी पुण्यात जोरदार आंदोलन
- एसटी तिकीट यंत्र खरेदी गैरव्यवहार प्रकरणी आज लोकायुक्तांपुढे सुनावणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
