मुंबई : राज्यात मराठा आरक्षणावरुन आता आरोपांच्या फैरी झडत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिल्यानंतर राज्यातील नेत्यांनी एकमेकांवर आरोप करणं सुरू केलं आहे. महाराष्ट्र शासनाने आरक्षणाची बाजू सर्वोच्च न्यायालयात चांगल्या पद्धतीने मांडली नाही असा आरोप विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला तर मला सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणासाठी युक्तिवाद करु नये असं फडणवीसांनी सांगितले होते असा आरोप महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी केला होता.
आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर पुन्हा एकदा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घणाघाती टीका केली आहे. उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना भाटगिरी हवी आहे. पण आम्ही भाटगिरी करणारे नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना हवं ते म्हटलं तर ते चांगलं. त्यांची स्तुती म्हणजेच भाटगिरी करावी, असं दोघांना वाटतं, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांची घणाघाती टीका केली. मात्र, त्यांची चूक दाखवली तर पत्रकार देखील जेलमध्ये जातात, असा टोलाही पाटील यांनी लगावला.
चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधला. महाभकास आघाडीला सरकारला मराठा आरक्षण टिकवता आले नाही. राज्य सरकारकडे मराठा आरक्षणाबाबत इच्छाशक्ती नाही. मुख्यमंत्री घरी बसून राज्य चालवणारे आहेत. सरकारकडून मराठा समाजाला उल्लू बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश हे उत्तर असू शकत नाही. अध्यादेश काढला तरी याचिकाकर्ते स्वस्थ बसणार नाहीत, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी सरकारला दिला आहे.बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात 45 दिवसांत FIR का दाखल केला नाही, असा सवाल देखील चंद्रकांत पाटील यांना केला आहे.
48 खासदारांसह 181 आमदारांचे पुतळे जाळणार
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी मराठा समाज आक्रमक झाल्याचं चित्र दिसत आहे. कोल्हापूरमध्ये येत्या 23 सप्टेंबर रोजी मराठा समाजाच्या वतीने गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. मराठा समाजातील नेते सुरेश पाटील यांनी ही माहिती दिली आहे. तर मराठा समन्वय समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात 48 खासदार आणि मराठा समाजातील 181 आमदारांचे प्रतिकात्मक पुतळे दहन करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
संसदेत सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात महाराष्ट्रातील 48 खासदारांनी मराठा आरक्षणाबाबत ठराव करावा, अशी मागणी मराठा समन्वय समितीच्या वतीनं करण्यात आली आहे. तर कोल्हापूरमध्ये होणाऱ्या गोलमेज परिषदेमध्ये राज्यभरातील मराठा संघटनांचे नेते आणि पदाधिकारी या गोलमेज परिषदेत सहभागी होणार आहेत. याच परिषदेमधून पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. त्यामुळे या गोलमेज परिषदेमध्ये नेमका काय निर्णय होतो, याकडे आता दक्षिण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- कुडाळ शहर पुन्हा एकदा लॉकडाउन; कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने प्रशासनाचा निर्णय
- महाराष्ट्रात आमचा उपमुख्यमंत्री नाही, याची खंत आहेच…
- विभागीय आयुक्त कार्यालयात वादळी चर्चा…. प्रशासनातच दोन गटबघा कुठली आहे घटना
- ‘दिल्लीत पवारांना हाणले होते ते मंत्री जितेंद्र आव्हाड विसरलेले दिसताहेत’- भाजप आमदार
- लॉकडाऊनला विरोध करत पालकमंत्री म्हणाले मृत्यूदर घटवा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

