पुणे : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत(Uday Samant) हे आज(१३ फेब्रु.)पुण्यातील बारामती दौऱ्यावर असून तेथील कृषी प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर सामंत यांनी विविध मुद्द्यांवरून प्रसार माध्यमांशी संवाद साधला. तसेच राज्यातील भौगोलिक स्थिती पाहता आता ऑनलाईनकडून ऑफलाईनकडे जावंच लागेल, असेही सामंत यावेळी म्हणाले.
यावेळी बोलत असतांना सामंत म्हणाले की,‘कोरोना संसर्गाच्या काळात आपण ऑनलाईन परीक्षांचा पर्याय स्वीकारला होता. मात्र, कोरोना संकट कमी होत आहे. राज्यातील भौगोलिक स्थिती आणि साधनांची उपलब्धता पाहता आता ऑनलाइनकडून ऑफलाईनकडे जावेच लागेल’, असे ते म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘१२ वी आणि सीईटीचे मार्क्स ग्राह्य धरून जर विद्यार्थ्याना न्याय देता आला तर भविष्यात त्यावर काम करणार.’ तसेच कोरोना काळात ऑनलाईन परीक्षांचा पर्याय वापरण्यात आला. परंतु आता आपल्याला ऑनलाईनकडून ऑफलाईनकडे जावंच लागेल, असेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- “इतिहास विसरून हे लोक बोलतात आणि…”, फडणवीसांचा हल्लाबोल
- IPL auction 2022 : जयंत यादव आणि विजय शंकर खेळणार गुजरातकडून
- शिवसेनेने प्रत्येकवेळी भाजपला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला- देवेंद्र फडणवीस
- ‘मै झुकेगा नही…’ म्हणत आमदार संदीप क्षिरसागरांचा विरोधकांना टोला
- आदित्य ठाकरेंच्या टीकेवर फडणवीसांचे प्रत्युत्तर; म्हणाले,‘कुणी कुणाच्या पाठीत खंजीर…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

