मुंबई : महाराष्ट्रात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी (Wine Sale) उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे सुपर मार्केट एक हजार स्क्वेअर फुटाच्यावर आहे. तिथे एक स्टॉल टाकून वाईन विक्रीला मुभा देण्यात येणार आहे. ठाकरे सरकारच्या (Thackeray Government) या निर्णयानंतर विरोधी पक्ष नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. असे असतांनाच महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांनी वाईन आणि दारूमध्ये फरक असल्याचे म्हंटले आहे. यावर नेटकऱ्यांकडून वाइन पिऊन गाडी चालवू शकतो का?, असे वेगवेगळे प्रश्न विचारण्यात येत आहे. दरम्यान, नेटकऱ्यांच्या या प्रश्नांना आता मुंबई पोलिसांनी चांगलेच उत्तर दिले आहे.
काही दिवसांपूर्वी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) म्हणाले होते की,‘वाइन म्हणजे दारू नाही. वाइनची विक्री वाढली तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळेल. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आम्ही हे केले आहे. भाजप फक्त विरोध करते पण शेतकऱ्यांसाठी काहीच करत नाही’, असे संजय राऊत म्हणाले होते. राऊतांच्या या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया बघायला मिळाल्या.त्यामधील एका नेटकऱ्याने ‘मी वाइन पिऊन गाडी चालवली तर मुंबई पोलीस मला जवळचा बार दाखवतील की मला तुरुंगात टाकतील?’, असा प्रश्न विचारला आहे.
https://twitter.com/ShivamVahia/status/1487111688407162886?s=20&t=9MHKopGVfnY5JXTJt3WCFA
दरम्यान, नेटकऱ्यांच्या अश्या प्रश्नांना आता मुंबई पोलिसांनी प्रत्युत्तर दिले असून यासंदर्भात त्यांनी ट्विट केले आहे. ट्विटमध्ये ‘सर, एक ‘जबाबदार नागरिक’ म्हणून तुम्ही मद्यधुंद अवस्थेत बारमधून उठून ड्रायव्हर असलेल्या गाडीत बसण्याची शिफारस करतो. जर तुम्ही दारूच्या नशेत गाडी चालवली आणि ब्रेथलायझरमध्ये तुमच्या ड्रिंकमध्ये अल्कोहोलचं प्रमाण आढळलं, तर तुम्हाला आमचे पाहुणे बनावे लागेल’, असे उत्तर मुंबई पोलिसांनी दिले आहे.
Sir, we recommend your raise your bar & ride in a chauffeur driven car, after drinking, like a ‘responsible citizen’.
Else if the breathalyzer detects the alcohol content in the wine you drank (which it will to be frank), you will have to be our guest behind the bars https://t.co/KS0WnOZ6pP— मुंबई पोलीस – Mumbai Police (@MumbaiPolice) January 29, 2022
महत्वाच्या बातम्या:
“२०१४ साली ज्यांनी युती तोडली त्या भाजपच्या नेत्यांना पूनम महाजन आता नामर्द म्हणणार का?”
गानसम्राज्ञी लता मंगेशकर कोरोनामुक्त; कोविड न्यूमोनियाचे झाले होते निदान
“मुख्य सचिवानेच पक्षाच्या प्रतिष्ठेची लक्तरे उडविली, मुख्यमंत्री उत्तर देणार काय?” बावनकुळेंचा सवाल
“आता रं…लोचा झाला की”, वाईनविक्री निर्णयावरील विरोधकांच्या टीकेला रुपाली पाटलांचे प्रत्युत्तर
“नॉटी नामर्द, बिगडे नवाब, नन्हें पटोले…”, अमृता फडणवीसांची खोचक टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

