बीड : जिल्ह्यामध्ये मागील अडीच महिन्यांपासून कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे लाॅकडाऊन सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील बारा बलुतेदारातील विविध घटक मोठ्या कोंडीत सापडला आहेत. जिल्हा प्रशासनाने बारा बलुतेदारांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जिल्हा ओबीसी काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.
याबाबत ओबीसी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वचिष्ट बडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माळी, धोबी, न्हावी, कुंभार, लोहार, सुतार, रंगारी, तेली, कुरेशी, कोळी, बागवान, वाणी समाज अशा अनेक समाजाचे छोटे छोटे व्यवसाय लॉकडाऊनमुळे बंद पडलेले आहेत. यामुळे हातावर पोट असलेले हे छोटे छोटे समाज उघड्यावर आले आहेत. अनेक जण आर्थिक अडचणींना सामोरे जात आहेत.
त्यामुळे राज्य सरकारने आर्थिक अडचणीत आलेल्या रिक्षावाले, फेरीवाले यांना जशी मदत केली याच धर्तीवर बारा बलुतेदारांनाही मदतीचा हात द्यावा, अशी मागणी बीड जिल्हा ओबीसी काँग्रेसच्या वतीने केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मागासवर्गीय पदोन्नतीचा आदेश रद्द करण्यात यावा, वंचित बहुजन आघाडीची मागणी
- डॉक्टरांविषयी ‘ते’ वक्तव्य अंगलट; IMA कडून बाबा रामदेव यांना १ हजार कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस
- ‘तुम्ही तज्ज्ञ नाहीत, रुग्णांच्या जिवाशी खेळू नका’, व्हेंटिलेटर प्रकरणावरून खंडपीठाने नेत्यांना सुनावले
- ‘राज्यकर्त्यांनी राजकारण सोडून मराठा समाजासाठी एकत्र यावे’, खा.संभाजीराजेंचे आवाहन
- मराठा समाजाला न्याय मिळावा हीच आपली भूमिका-खा.संभाजीराजे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

