Share

शिवसेना पदाधिकाऱ्यांनाच नाही मनपावर भरवसा!

Published On: 

औरंगाबाद : वाळूज एमआयडीसी परिसरातील ग्रामपंचायतचा औरंगाबाद मनपात समावेश करण्याच्या प्रस्तावाला या भागातील सर्वच गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य आदी लोकप्रतिनिधींनी तीव्र विरोध केला आहे. याविराेधात लढण्यासाठी नुकत्याच झालेल्या बैठकीत एक कृती समितीही स्थापन करण्यात आली. या परिसरातील बहुतांश ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात आहे तर मनपा देखील अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात आहे. त्यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यानाच शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मनपावर भरवसा नाही का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

वाळूज एमआयडीसी परिसरातील ग्रामपंचायती महानगर पालिकेत सामाविष्ट करण्याच्या हालचाली शासनस्तरावरून मोठ्या प्रमाणत सुरु आहे . तर त्याला ग्रामपंचायत स्तरावर मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात येत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. याच अनुषंगाने वाळूज एमआयडीसी परिसरात एक सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली.

यामध्ये ‘संत गाडगेबाबा ग्रामपंचायत बचाव कृती समिती, संभाजीनगर’ अशी एक सर्व पक्षीय कृती समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी तिसगावचे राजेश रामचंद्र कसुरे यांची, तर सचिव म्हणून वडगावचे सरपंच सचिन गरड यांची निवड करण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!