Share

मोबाईल टॉवर्सकडे कोट्यवधी थकित, पालिका नेमणार खासगी एजन्सी

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : औरंगाबाद महापालिकेच्या क्षेत्रात विविध मोबाईल फोन कंपन्यांचे मिळून सुमारे सहाशे टॉवर्स आहेत. या टॉवर्सच्या मालमत्ता करापोटी कोट्यवधी रुपये कंपन्यांकडे थकले आहेत. ते वसुल करण्यासाठी खासगी एजन्सी नियुक्त करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. एजन्सीच्या नियुक्तीसाठी लवकरच जाहिरातदेखील काढली जाणार आहे.

मोबाईल फोन कंपन्यांच्या टॉवरकडे थकीतअसलेला मालमत्ता कर हा दरवर्षी चर्चेचा विषय बनलेला असतो. शहरात सुमारे सहाशे टॉवर्स असून त्यांच्याकडे मिळून किमान ३४ कोटी रुपयांची थकबाकी आहे. कंपन्या कर आणि थकबाकी भरत नसल्यामुळे पालिकेकडून टॉवर सील करण्याची कारवाई केली जाते. पालिकेच्या या कारवाईला कंपन्यांकडून न्यायालयात आव्हान दिले जाते. त्यामुळे वर्षाकाठी आठ ते दहा कोटी रुपयांचीच कर वसुली होते.

राज्यातील इतर महापालिकांमध्ये टॉवर्सच्या मालमत्ता कर वसुलीची पध्दत काय आहे याची माहिती औरंगाबाद महापालिकेच्या माध्यमातून घेण्यात आली. नाशिक, नगर आणि मीरा-भाइंदर या महापालिकांनी खासगी एजन्सीच्या माध्यमातून टॉवर्सच्या मालमत्ता कराची वसुली करण्याचे काम सुरु केले त्यामुळे कर वसुलीचे प्रमाण तीन पटीने वाढले अशी माहिती महापालिकेच्या उपायुक्त तथा करमुल्य निर्धारक व संकलक अपर्णा थेटे यांनी दिली. त्या तीन महापालिकांनी राबवलेला प्रयोग औरंगाबाद महापालिकेत राबवण्याचा निर्णय झाला आहे. त्याला प्रशासकांनीदेखील मान्यता दिली आहे. त्यानुसार कर वसुलीसाठी खासगी एजन्सी नियुक्त करण्यासाठी लवकरच निविदा प्रसिद्ध केली जाईल असे थेटे यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!