🕒 1 min read
औरंगाबाद : औरंगाबाद महापालिकेच्या क्षेत्रात विविध मोबाईल फोन कंपन्यांचे मिळून सुमारे सहाशे टॉवर्स आहेत. या टॉवर्सच्या मालमत्ता करापोटी कोट्यवधी रुपये कंपन्यांकडे थकले आहेत. ते वसुल करण्यासाठी खासगी एजन्सी नियुक्त करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. एजन्सीच्या नियुक्तीसाठी लवकरच जाहिरातदेखील काढली जाणार आहे.
मोबाईल फोन कंपन्यांच्या टॉवरकडे थकीतअसलेला मालमत्ता कर हा दरवर्षी चर्चेचा विषय बनलेला असतो. शहरात सुमारे सहाशे टॉवर्स असून त्यांच्याकडे मिळून किमान ३४ कोटी रुपयांची थकबाकी आहे. कंपन्या कर आणि थकबाकी भरत नसल्यामुळे पालिकेकडून टॉवर सील करण्याची कारवाई केली जाते. पालिकेच्या या कारवाईला कंपन्यांकडून न्यायालयात आव्हान दिले जाते. त्यामुळे वर्षाकाठी आठ ते दहा कोटी रुपयांचीच कर वसुली होते.
राज्यातील इतर महापालिकांमध्ये टॉवर्सच्या मालमत्ता कर वसुलीची पध्दत काय आहे याची माहिती औरंगाबाद महापालिकेच्या माध्यमातून घेण्यात आली. नाशिक, नगर आणि मीरा-भाइंदर या महापालिकांनी खासगी एजन्सीच्या माध्यमातून टॉवर्सच्या मालमत्ता कराची वसुली करण्याचे काम सुरु केले त्यामुळे कर वसुलीचे प्रमाण तीन पटीने वाढले अशी माहिती महापालिकेच्या उपायुक्त तथा करमुल्य निर्धारक व संकलक अपर्णा थेटे यांनी दिली. त्या तीन महापालिकांनी राबवलेला प्रयोग औरंगाबाद महापालिकेत राबवण्याचा निर्णय झाला आहे. त्याला प्रशासकांनीदेखील मान्यता दिली आहे. त्यानुसार कर वसुलीसाठी खासगी एजन्सी नियुक्त करण्यासाठी लवकरच निविदा प्रसिद्ध केली जाईल असे थेटे यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- …म्हणून मराठवाड्यात सर्वच कोविड सेंटरवर महिला सुरक्षा रक्षकांच्या नेमणूकीचा निर्णय
- आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार; आंदोलकांचा पवित्रा
- गॅस दरवाढीचा निषेध; महिलांनी पंतप्रधान मोदींना पाठवल्या गोवऱ्या
- धनंजय मुंडेंना धक्का, ‘या’ ठिकाणी नमिता मुंदडा यांचे पुन्हा एकदा वर्चस्व
- कोरोनामुळे यंदा वेरूळ येथील महाशिवरात्रीची यात्रा रद्द, भाविकांनी घरूनच घेण्याचे आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
