Share

प्रशासनाच्या ‘या’ निर्णयावर व्यापारी आक्रमक

Published On: 

नांदेड : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रभाव बघता जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन लावण्यात आले आहे. पण या लॉकडाऊन मध्ये प्रशासनाने काही व्यवसाय सुरु करण्याची परवानगी दिल्यामुळे जिल्ह्यातील इतर व्यापाऱ्यांनी आम्हाला पण परवानगी द्या अशी मागणी करत. प्रशासनाविरोधी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यामुळे येत्या काळात प्रशासन आणि व्यापाऱ्यात संघर्ष वाढू शकतो.

१ मार्च ते ७ मार्च पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी लागू केल्याने व्यापाऱ्यांनी सुद्धा प्रशासनाला सहकार्य केले. या संचारबंदी नंतर जिल्ह्यातील व्यापार आता पूर्व पदावर आणण्यासाठी प्रशासन व्यापाऱ्यांना मदत करेल अशी अपेक्षा होती. पण या उलट संचारबंदी संपल्यानंतर प्रशासनाने काही मोजक्याच दुकानांना उघडण्याचा निर्णय घेतल्याने व्यापाऱ्यांनी सुद्धा आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे. ७ मार्चला व्यापाऱ्यांकडून घेण्यात आलेल्या बैठकीत मुख्यमंत्र्याना पत्र पाठवण्याचे ठरवण्यात आले. मुख्यमंत्र्यांकडे विनंती करून लवकरात लवकर काही निर्णय व्हायला हवा अशी मागणी सध्या व्यापारी करत आहेत.

मागील वर्षी झालेल्या लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. या आर्थिक फटक्यातून बाहेर येणाच्या प्रयत्नात असलेला व्यापारी आता पुन्हा संकटाच्या छायेत अडकला आहे. जर पुन्हा व्यापाऱ्यांची दुकाने बंद ठेवण्यात आली तर जिल्ह्याचे अर्थचक्र होईल. याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!