Share

‘त्या’ निनावी फोनने वाचले दोघींचे आयुष्य

Published On: 

औरंगाबाद : दक्ष नागरिकाच्या निनावी फोनची प्रशासनाने वेळीच दखल घेऊन कारवाई केल्याने बिडकीनमध्ये दोन सख्ख्या बहिणींचे बालविवाह थांबवण्यात यंत्रणेला यश आले आहे. या दोन्ही मुलींना बालकल्याण समितीने पालकांच्या ताब्यात दिले असून, त्यांच्या वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय त्यांचा विवाह होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे स्पष्ट आदेश यावेळी समितीने दिले.

बिडकीनमध्ये बालविवाह होणार असल्याची माहिती चाइल्ड लाइन आणि बाल संरक्षण कक्षाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे जिल्ह्यात गेल्या आठवड्यात महिला बालकल्याण विभाग व पोलिस अधिकाऱ्यांच्या मदतीने पैठण तालुक्यातील बिडकीन येथील दोन व औरंगाबाद तालुक्यातील लासुर स्टेशन दोन असे एकूण चार विवाह रोखण्यात यश आले होते. या घटनेतील मुलींचे वय हे अवघे ९, १०, ११ व १३ वर्ष होते. बिडकीन येथील मुली शेवगाव तालुक्यातील तर लासुर स्टेशन येथील मुली नेवासा फाटा भागातील आहेत. या बालविवाहाची माहिती अॅड. गवांदे यांना मिळाली होती.

बालविवाह कायद्याविषयी आम्हाला माहिती नाही : पालक

‘आमच्या समाजात मुलींचे लवकर लग्न लावण्याची रीत आम्ही पाळतो. बालविवाह कायद्याविषयी आम्हाला माहिती नाही, असे या पालकांचे म्हणणे होते. त्यावर बिडकीन पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक प्रशांत मुंडे यांच्यासह चाइल्डलाइनचे यशवंत इंगोले, आम्रपाली बोर्डे, बालसंरक्षण कक्षाच्या संरक्षण अधिकारी कल्पना मोहिते व इतर अधिकाऱ्यांनी हा बालविवाह थांबवत मुलींना बालकल्याण समिती समक्ष नेले. यावेळी समितीने पालकांचे समुपदेशन केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!