बीड : बीड जिल्ह्यातील माजलगाव, गेवराई, बीड यांसह काही तालुक्यांमध्ये काल सायंकाळपासून मुसळधार पाऊस पडत असून, बहुतांश भागात अजूनही पाऊस सुरू आहे तसेच काही तालुक्यात आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे; या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने 24 तास सतर्क राहून आवश्यक तिथे मदत कार्य करावे अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्या आहेत.
अनेक ठिकाणी खरीप पिकांचे व फळ बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पावसाने उघडीप देताच विमा कंपनी, महसूल व कृषी विभागामार्फत पंचनामे करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात येईल. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा व मदत देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. काही गावांचा संपर्क तुटल्याचेदेखील वृत्त येत आहे.
त्यामुळे आधी नागरिकांच्या सुरक्षा उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाने सज्ज रहावे, कुठेही जीवित किंवा वित्त हानी होणार नाही या दृष्टीने तातडीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश मुंडे यांनी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांना दिले आहेत. पावसाचा तडाखा पूर्णपणे कमी होईपर्यंत नागरिकांनी काळजी घ्यावी, धोक्याचे ठिकाण, जलाशय, वाहत्या नद्या अशा ठिकाणी जाण्याचे टाळावे व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन मुंडे यांनी जिल्हावासियांना केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘माझ्या तोंडी ते वादग्रस्त वाक्य घालण्यात आले’; अण्णा हजारेंनी दिले स्पष्टीकरण
- अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान विकसित करा ; कृषिमंत्र्यांनी केली आयआयटीच्या संशोधकांनी विनंती
- ‘भटक्या समाजासाठी मोदींच्या पाया पडू, बावनकुळेजी घेऊन चला’; वडेट्टीवार यांची साद
- शिवसेना फोडणार कोरोनाची दहीहंडी; सॅनेटाईझर, मास्क, लसींच्या थरातून कोरोनाविषयक जनजागृती!
- सरकारच्या ‘नाकावर टिच्चून’ दहिहंडी फोडली, मनसे जिल्हाध्यक्ष दाशरथे यांचा दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

