Share

‘माझ्या तोंडी ते वादग्रस्त वाक्य घालण्यात आले’; अण्णा हजारेंनी दिले स्पष्टीकरण

Published On: 

नगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ‘केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची केलेल्या अवस्थेवरून अण्णा गप्प का आहेत ? झोपले की काय?’ असे सवाल समाज माध्यमांमधून केला जात आहेत. अशातच एका वृत्तपत्रामध्ये अण्णा हजारेंच्या नावाने खोटी बातमी छापून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

‘नाही तरी शिक्षक शाळेत जाऊन कोणता उजेड पाडतात’ या मथळ्याखाली अण्णा हजारेंच्या नावाने एका स्थानिक वृत्तपत्राने बातमी लावली होती. यानंतर शिक्षक वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, काही ठिकाणी शिक्षक संघटनांनी निषेध म्हणून आंदोलन देखील केले. मात्र, आता ते वृत्त खोटे असून असे विधान माझ्या तोंडी घालून समाजात द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे स्पष्टीकरण अण्णा हजारे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले आहे.

anna hazare letter

सदर वृत्तपत्राविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगतानाच त्यांनी शिक्षकांप्रती आपली भावना देखील व्यक्त केली आहे. ‘समाजात शिक्षकांची अतिशय महत्वाची भूमिका आहे. नवीन पिढी घडवण्याचे काम शिक्षकच करतात. त्यामुळे समाजात शिक्षकांविषयी आदराची भावना असते. मी देखील शिक्षकांविषयी कायमच आदर व्यक्त केला आहे. मात्र कालच्या वृत्तामुळे मला खेद वाटला. संपूर्ण शिक्षक वर्गात संभ्रम निर्माण झाल्याचे सोशल मीडियावर दिसून आले. द्वेषभावना हि समाज व देशासाठी घातक असून अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नये,’ असं आवाहन देखील अण्णा हजारे यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!