Share

राज्यात दिवसभरात ६३ हजार ३०९ रुग्णांची वाढ, ९८५ जणांचा मृत्यू

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रात सध्या लॉकडाउनचे निर्बंध लागू असून हा लॉकडाऊन पुढचे किमान १५ दिवस तरी अजून वाढणार असल्याचे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. मात्र, त्यानंतर देखील राज्यात करोना रुग्णांची आकडेवारी खाली येताना दिसत नाहीये. पण आज दिवसभरात राज्यातल्या वेगवेगळ्या रुग्णालयांमधून आणि कोविड केंद्रांमधून बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांचा आकडा ही राज्याच्या दृष्टीने दिलासादायक बाब ठरली आहे.

आज राज्यात ६२ हजार ३०९ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झालेय. तर ६१ हजार १८१ रुग्ण बरे होऊन घरी परतलेत. राज्यात आजपर्यंत एकूण ३७ लाख ३० हजार ७२९ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजे रिकव्हरी रेट ८३.४ टक्के एवढा झाला आहे. राज्यात आज सर्वाधिक ९८५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५ टक्के एवढा आहे.

राज्यातील मृतांचा आकडा आज पुन्हा प्रशासनाची आणि सरकारची देखील चिंता वाढवणारा ठरला. गेल्या २४ तासांमध्ये राज्यात ९८५ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे गेल्या महिन्याभरात राज्यातील मृतांच्या आकड्यामध्ये झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. आजच्या संख्येनंतर राज्यातील एकूण मृतांचा आकडा आता ६७ हजार २१४ इतका झाला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!