मुंबई : राज्यात आज ३,६४३ नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर आज ६,७९५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ६२,३८,७९४ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे आता राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.०५% एवढे झाले आहे.
तर राज्यात आज १०५ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मतृयदूर २.११% एवढा आहे.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,२४,४५,६८९ प्रयोगशाळा नमनुयाांपैकी ६४,२८,२९४ (१२.२६टक्के) नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. तर सध्या सध्या राज्यात ३,०२,८८८ व्यक्ती होमक्वारांटाईनमध्ये आहेत तर २,४८७ व्यक्ती सांस्थातमक क्वारांटाईनमध्ये आहेत.
दरम्यान आता दहीहंडी साजरी केल्याने जास्त मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो असं टास्क फोर्सने सांगितले आहे. असे सांगून राज्य सरकारने यंदाच्या दहीहंडी लाल झेंडा दर्शवला आहे. एकंदरच कोरोना विषाणूचे संकट अद्याप टळले नसल्याने राज्यात दहीहंडी उत्सवाला ठाकरे सरकारने परवानगी नाकारली आहे. याबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये दहीहंडी संघांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी राज्यात दहीहंडीला परवानगी नाकारण्यामागची कारणे देखील सांगितली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘गुन्हे दाखल केले तरी दहीहंडी साजरी करणाऱ्या मंडळांच्या पाठीशी मनसे ठाम उभी राहील’
- ‘शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मी मुख्यमंत्र्यांकडे गेलो होतो पण त्यांनी भेट दिलीच नाही’; शेट्टींची जाहीर नाराजी
- ‘दहीहंडीसाठी कोरोनाचा बाऊ कशाला? ; दहीहंडी साजरी करणाऱ्या मंडळांच्या पाठीशी मनसे उभी राहणार’
- पुणे जिंकणार, कोरोना हरणार! आज नव्या कोरोना बाधितांची संख्या केवळ दोन आकडी
- ‘पर्यावरणाच्या दृष्टीने वाघ महत्वाचा असला तरी मानवाचा जीवसुध्दा महत्वाचाच’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

