Share

‘गुन्हे दाखल केले तरी दहीहंडी साजरी करणाऱ्या मंडळांच्या पाठीशी मनसे ठाम उभी राहील’

Published On: 

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने सलग दुसऱ्या वर्षी दहीहंडी उत्सवाच्या आयोजनाला परवानगी नाकारली आहे. आज सोमवारी दुपारी दहीहंडी मंडळं, गोविंदा पथकांच्या समन्वय समितीसोबत बैठक घेण्यात आली. यानंतर दहीहंडीच्या आयोजनाला परवानगी नाकारण्यात आली. यंदा देखील कोरोनाचे सावट कायम असल्याने सर्व धर्मियांनी सण-उत्सव साधेपणाने साजरे करावे असे आवाहन केले जात आहे. मात्र, कोरोना प्रतिबंधक नियम पाळून, गोविंदांचे लसीकरण करून अटींसह दहीहंडी उत्सव साजरा करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली होती.

राज्य सरकारने परवानगी नाकारल्यानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. गुन्हे दाखल झाले तरी दहीहंडी उत्सव साजरा करणारच असा निश्चय विरोधकांनी केला आहे. अटींसह दहीहंडीला परवानगी द्यायला हवी होती असं विरोधकांनी म्हटलं असलं तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दहीहंडी समन्वय समिती आणि मंडळांना समजावल्यानंतर समन्वय समितीने देखील दहीहंडी साजरा न करण्याचे मान्य केले आहे.

दरम्यान, आता गुन्हे दाखल झाले तरी मनसे दहीहंडी मंडळांच्या मागे खंबीर उभी राहील, असा शब्द मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिलाय. त्यामुळे दहीहंडीच्या आयोजनावरून संघर्ष निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. ‘कितीही बंधने घातली, गुन्हे दाखल केले तरी दहीहंडी साजरी करणाऱ्या मंडळांच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठामपणे उभी राहील. सरकारला फक्त मराठी सणांमध्येच कोविड दिसतोय,’ असा टोला अविनाश जाधव यांनी राज्य सरकारला लगावलाय.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!