Share

मुंबईकरांवर लोकल प्रवासासाठी वेळेचं बंधन; मनसेची खोचक टीका

Published On: 

मुंबई : 1 फेब्रुवारीपासून मुंबई लोकल सर्वांसाठी खुली करण्यात येणार असल्याचं, राज्य सरकारनं सांगितलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांसोबत इतर काही लोकांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची परवानगी राज्य सरकारनं दिली होती. पण सर्वसामान्य माणसांना मात्र परवानगी देण्यात आलेली नव्हती. आता मात्र गर्दी होणार नाही अशा वेळा आखून मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी सर्वसामान्यांना देण्यात आली आहे.

लोकल प्रवासासाठी परवानगी नसल्याने प्रवास करताना सामान्य मुंबईकरांचे हाल होत होते. बेस्टमध्ये होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा धोका अधिक असून चाकरमान्यांना आर्थिक भूर्दंड देखील सहन करावा लागत असल्याने मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी आंदोलन देखील पुकारलं होतं. आता राज्य सरकारने मुंबईकरांना लोकल प्रवासाची मुभा दिली असून वेळेचं बंधन घालण्यात आलं आहे.

गर्दीची वेळ सोडून म्हणजेच सकाळी ७ च्या अगोदर, नंतर दुपारी १२ ते ४ दरम्यान आणि रात्री ९ नंतर, अशा मर्यादित कालावधीतच प्रवास करता येणार आहे. यावर संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. ‘मूर्ख सरकारचं ऐकू नका.’ असं म्हणत ‘नागरिकांनी बिनधास्त प्रवास करावा,’ असं आवाहन त्यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!