Share

‘ठाकरे सरकारच्या बेफिकिरीमुळे ओबीसी आरक्षण गमावले’, माजी मंत्री बावनकुळे यांची टीका

Published On: 

नागपूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकार झोपलेले आहे. या सरकारच्या बेफिकिरीमुळेच ओबीसींना आरक्षण गमवावे लागले. त्यामुळे या सरकारला झोपेतून जागे करण्यासाठी राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे, अशी घोषणा भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना केली.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसंख्येच्या आधारेच ओबीसींना आरक्षण दिले. त्यासाठी त्यांनी अध्यादेश काढला होता. मात्र, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ओबीसींच्या आरक्षणाकडे लक्ष दिले नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेकडे त्यांनी दुर्लक्ष केले. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार राज्य सरकारने आयोगाची स्थापना केली नाही. हे दुटप्पी सरकार आहे. ओबीसींच्या मतांवर हे सरकार सत्तेत आले. मात्र ओबीसींवरच अन्याय करत आहे. त्यामुळेच राज्य सरकारच्या दुटप्पी भूमिकेविरोधात भाजप राज्यभर आंदोलन करणार असल्याचे ते म्हणाले.

ओबीसींच्या आरक्षण प्रश्नाशी केंद्राचा संबंध येत नाही. हा राज्याचा विषय आहे. राज्य सरकार खोटे बोलत आहेत. सरकारने तातडीने डाटा तयार करावा. एका महिन्यात आयोग स्थापन करून तीन महिन्यांत डाटा तयार करा आणि तो सुप्रीम कोर्टात सादर करावा, अशी मागणीही त्यांनी केली. या वेळी त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावरही टीका केली. अमोल मिटकरी हे काव्य करण्यात माहीर आहेत, पण त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर बोलावे एवढी त्यांची उंची नाही, असा चिमटा त्यांनी काढला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!