दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी यावर्षीचा अर्थसंकल्प (Budget 2022) सादर केला. त्यांचे अर्थसंकल्पीय भाषण ९२ मिनिट चालले. त्यांचे हे भाषण त्यांनी आजपर्यंत त्यांनी केलेले सर्वात छोटे भाषण आहे. मागच्या वर्षी त्यांचे भाषण १ तास ५० मिनिट चालले होते. तर २०२० मध्ये त्या पावणेतीन तास बोलल्या होत्या.
तसेच २०२० चे त्यांचे भाषण आजपर्यंत कोणत्याही अर्थमंत्र्याने दिलेले सर्वात मोठे भाषण होते. पण त्या भाषणादरम्यान त्यांची तब्येत बिघडली होती आणि शेवटची दोन पाने त्यांची वाचली नव्हती. मोदी २.० मध्ये वित्तमंत्री झाल्यानंतर २०१९ मध्ये त्यांनी आपले पहिले भाषण केले. तेव्हा त्या २ तास १७ मिनिट बोलल्या होत्या. त्यावेळी त्यांनी जसवंत सिंहाचा विक्रम मोडीत काढला होता.
यावेळेस त्यांनी अर्थसंकल्प डिजिटल पद्धतीने सादर केला. यावेळी अर्थसंकल्पाचे वाचन टँबलेटवर केले आहे. भाषणात हिंदी, उर्दू, तमिळ कवितांचा वापर करणे हे सीतारामन यांचे वैशिष्ट्य आहे. यावेळेस त्यांनी राज्यधर्माशी संबधित महाभारतातील श्लोक वापरला आहे. साधारणपणे अर्थसंकल्पीय भाषण पावणेदोन ते दोन तास चालते.
महत्वाच्या बातम्या:
आगामी वेस्टइंडीज विरुद्ध इंडिया टी-२० मालिकेसाठी ममता बनर्जी सरकारचा मोठा निर्णय
“राजाला जर कल्याण साधायचं असेल…”, अर्थसंकल्पादरम्यान निर्मला सीतारामण यांनी दिला महाभारताचा संदर्भ
टी २० वर्ल्ड कप मधील गोलंदाजी विषयी हार्दिक पंड्याने केला मोठा खुलासा
नासाची एक चूक अन् अंतराळवीर कल्पना चावलाचा अंत..! वाचा नेमकं काय घडलं होतं?
‘माध्यमवर्गाच्या तोंडाला पाने पुसणारा अर्थसंकल्प’; यशोमती ठाकूर यांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

