अमरावती: आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्प (Budget 2022) सादर केला आहे. यात त्यांनी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली आहे. तब्बल ६० लाख नव्या नोकऱ्या, ४०० नव्या वंदे भारत ट्रेन अशा धडाकेबाज घोषणांनी बजेटची ओपनिंग केली. मात्र, यासाठी निधी कसा आणि कुठून आणणार याचा उल्लेख त्यांनी भाषणात तरी केला नाही.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेट सादर केल्यावर कॉंग्रेस पक्षाने यावर टीका केली आहे. देशाला मजबूत आर्थिक धोरण हवेत, जुमलेबाजी नाही, अशा शब्दात कॉंग्रेसने टीका केली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी देखील टीका केली आहे. सामन्यांचा आवाज ऐकाचा नाही, असेच या सरकारने ठरवले आहे, अशी टीका ठाकूर यांनी केली आहे.
पगारदार आणि मध्यमवर्गाच्या तोंडाला पाने पुसणारा अर्थसंकल्प. कोविड काळात संकटात सापडलेल्या मध्यमवर्गासाठी आयकरात कुठलाच बदल किंवा सवलत नाही. हे सरकार संवेदनशील नाही. सामान्य माणसांचा आवाज ऐकायचा नाहीच असंच सरकारने ठरवलेले दिसतेय. @INCIndia #BudgetSession2022 #BudgetSession
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) February 1, 2022
यशोमती ठाकूर यांनी ट्विट करत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. ठाकूर म्हणाल्या, पगारदार आणि मध्यमवर्गाच्या तोंडाला पाने पुसणारा अर्थसंकल्प. कोविड काळात संकटात सापडलेल्या मध्यमवर्गासाठी आयकरात कुठलाच बदल किंवा सवलत नाही. हे सरकार संवेदनशील नाही. सामान्य माणसांचा आवाज ऐकायचा नाहीच असंच सरकारने ठरवलेले दिसतेय, अशा शब्दात ठाकूर यांनी टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
शेतकऱ्यांसाठी सर्वात चांगलं बजेट, घरं, रेल्वे, १ लाख कोटी महाराष्ट्राला-खा. नवनित राणा
ऑलिंपिक पदकविजेता पी.श्रीजेश बनला “वर्ल्ड गेम अँथलीट ऑफ द इयर”
Budget 2022: या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय? वाचा सविस्तर
भारताचा पहिला अर्थसंकल्प केव्हा आणि कोणी सादर केला? जाणून घ्या..
गोरगरीब नागरिकांपेक्षा जनावरे महत्वाची आहेत का? जलील यांचा प्रशासनावर गंभीर आरोप!


