🕒 1 min read
Mumbai : जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू झालेल्या पावसाने परतीच्या पावसाची चाहूल राज्यातील काही भागात दिली आहे. राज्याच्या काही भागांत 30 सप्टेंबरपासून 6 ऑक्टोबरपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळेही राज्यातून मान्सूनचा परतीचा प्रवास उशिरा होण्याची शक्यता आहे. असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
मागच्या चार दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा बरसण्यास सुरूवात केली आहे. काही तासांपासून मुंबई आणि उपनगरात पावसाची रिपरिप सुरू आहे. मुंबई शहरासह दादर, रावळी कँप यासह अन्य भागात पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, आज (दि.24) आणि उद्या (दि.25) कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही आणि तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
विदर्भ आणि कोकण-गोवा सोडून महाराष्ट्रात पुढील दोन-तीन दिवस पावसाचा जोर कमी होईल. उत्तर-मध्य कोकणात ३० सप्टेंबरपर्यंत सरासरीपेक्षा काहीसा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज आहे. ३० सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या काळात उत्तर मध्य महाराष्ट्र, संपूर्ण विदर्भ आणि दक्षिण कोकणात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो, तर पुण्यासह राज्यात त्या कालावधीत साधारण पाऊसच्या सरी पडू शकतात.
कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भात 27 सप्टेंबर पर्यंत पाऊस कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. कोकण, गोवा आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीत जोरदार पावसाची शक्यता असून हवामान खात्याने या ठिकाणी यलो अलर्ट जारी केला आहे.
26 सप्टेंबरला लातूर, नांदेड, परभणी, वाशिम, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत. 27 सप्टेंबर रोजी जळगाव, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, परभणी, लातूर, नांदेड, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोलीला यलो अलर्ट देण्यात आला आहे. 28 सप्टेंबरला विदर्भातील सर्व जिल्ह्यांना, मराठवाड्यातील परभणी, उस्मानाबाद, नांदेड जिल्हे वगळता सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील जळगावला देखील यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Tanaji Sawant | मराठा आरक्षणाबाबत तानाजी सावंतांनी केलं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले…
- Chandrashekhar Bawankule | “नाना पटोले हे देवेंद्र फडणवीसांच्या नखाचीही बरोबरी करू शकत नाही”
- Bindass Kavya | फॉलोअर्स वाढवण्यासाठी बिंदास काव्या झाली होती गायब ; पालकांनी मिळून केला चित्रपटाला लाजवेल असा ड्रामा
- Uday Samant | संतोष बांगर ताफ्यावरील हल्ला प्रकरणी शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…
- Devendra Fadnavis | “सत्तेवर असताना यांनी केवळ केंद्र सरकारला शिव्या द्यायचं काम केलं आणि आता…”; फडणवीसांचा आदित्य ठाकरेंवर पलटवार
- Santosh Bangar । “…तर त्यांना दाखवलं असतं”; हल्ल्यानंतर संतोष बांगर यांची पहिली प्रतिक्रिया
- Santosh Bangar । शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या वाहनावर शिवसैनिकांचा हल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
