🕒 1 min read
नागपूर : नागपूर विधान परिषद निवडणुकीत ऐनवेळी काँग्रेसने आपला उमेदवार बदलला. डॉ. रवींद्र भोयर(Ravindra Bhoyar) यांच्याऐवजी आता मंगेश देशमुख(Mangesh Deshmukh) यांना काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर आता भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी याविषयी भाष्य केले आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना बावनकुळे म्हणाले की,’नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यायला हवा. कारण ते आता हतबल झाले असून काँग्रेसला न्याय देऊ शकणार नाही. दोन मंत्र्यांच्या दबावाखाली येऊन महाराष्ट्र काँग्रेसला आपला निर्णय बदलावा लागला हे अत्यंत लाजिरवाणे चित्र आहे. काँग्रेसच्याच दोन मंत्र्यांनी दबाव टाकल्याने नाना पटोलेंनी उमेदवार बदलला. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. पक्षाच्या मंत्र्यांवरच त्यांचे नियंत्रण नाही.’ तसेच ही महाराष्ट्र काँग्रेसच्या इतिहासातील सर्वात वाईट घटना आहे, असेही बावनकुळे यावेळी म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’जर ते मंत्र्याच्या दबावाखाली काम करणारे असतील तर ते प्रदेशाध्यक्ष बनण्याच्या लायकीचे नाही. १३ दिवसांच्या प्रचारानंतरही उमेदवार बदलावा लागतो यापेक्षा नामुष्की आणि शरमेची बाब कोणतीही नाही. असा हतबल प्रदेशाध्यक्ष काँग्रेसला न्याय देऊ शकत नाही. मंत्र्यांवर कारवाई करायची की नाही हा काँग्रेसचा निर्णय आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये विदर्भात काँग्रेसची वाट लागणार आहे’, असेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘सरकार फक्त मेकअप व रंगसफेदी करीत असून प्रत्यक्षातले चित्र भेसूर’
- ३७८ दिवस अशा पद्धतीने चाललेला लढा जगात दुसरा झाला नसेल- संजय राऊत
- गांधी गोर्यांशी लढले, आम्ही चोरांशी लढू- नवाब मलिक
- ‘मुस्लिमांनी मशिदीत जाऊन नमाज अदा करावी,दर आठवड्याला मोकळ्या मैदानात एकत्र येणे चुकीचे’
- मला कोणावरही आरोप करायचे नाहीत पण व्यवस्थेमुळे…- नितीन गडकरी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
