चेन्नई : मगंळवारी चेन्नई येथे झालेल्या आयपीएलच्या अंत्यत चुरशीच्या सामन्यात रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने विजयाची गुढी उभारत कोलकाता नाइट रायडर्सचा १० धावांनी पराभव केला आहे. या विजयासोबत मुंबईने या मोसमातील आपल्या पहिल्याच विजयाची नोंद केली आहे. तसेच कोलकाताविरुद्ध विजयाची पंरपरा कायम ठेवली आहे.
सामन्यातील पहिल्या डावात कोलकाताच्या गोलंदाजानी चांगली कामगीरी करत मुंबईच्या संघाला केवळ १५३ धावांवर रोखले. विशेष म्हणजे कोलकाताच्या गोलंदाजानी आयपीएलमधील बलाढ्य फलंदाजी अशी ख्याती असलेल्या मुंबई इंडियन्सचा संपुर्ण संघ बाद केला. दुसऱ्या डावातही कोलकाताने अतिशय जोरदार सुरुवात केली. मागील सामन्यातील सामनावीर नितीश राणाने या सामन्यातही आपल्या बॅटचा तडाखा मुंबईच्या गोलंदाजाना दाखवत अर्धशतक झळकावले. ज्यावेळी केकेआरचा पहिला गडी बाद झाला त्यावेळी धावसंख्या होती ७२, याचा अर्थ कोलकाताने जवळपास अर्धे लक्ष्य केवळ एका गडीच्या मोबदल्यात पार केले होते आणि तेही केवळ ९व्या षटकात.
या परिस्थीतीत केकेआरचा विजय निश्चीत मानला जात होता. मात्र नितीश राणा बाद झाल्यानंतर कोलकाताच्या इतर फलंदाजाना दुहेरी आकडा देखील गाठता आला नाही. विस्फोटक फलंदाज अशी ख्याती असलेला आंद्रे रसलने १५ चेंडुत केवळ ९ धावा केल्या. तसेच राहुल त्रिपाठी, मॉर्गन, शाकिब अल हसन हे बेजबाबदार फटके खेळून बाद झाले. त्यामुळे कोलकाताने हाती आलेला सामना गमावला.
महत्वाच्या बातम्या
- आखेरच्या चार षटकात बदलले सामन्याचे चित्र; मुंबईच्या गोलंदाजानी लढवली खिंड
- पहिल्या विजयानंतर मुंबई इंडियन्सची गुणतालीकेत भरारी; केकेआरची झाली घसरण
- मुंबई इंडियन्सने उभारली विजयाची गुढी ; केकेआरचा १० धावांनी केला पराभव
- ‘असंघटीत क्षेत्रातील मजूर ते गावगाड्यातील बाराबलुतेदारांचा साधा विचारही या सरकारनं केलेला नाहीये’
- आर्थिक मदत महाराष्ट्राच्या एकूण जीडीपीच्या एक टक्के देखील होत नाही
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

