Share

आर्थिक मदत महाराष्ट्राच्या एकूण जीडीपीच्या एक टक्के देखील होत नाही

Published On: 

मुंबई : मुख्यमंत्र्यांचे निवेदन म्हणजे गोंधळलेल्या दिशाहिन नेत्याचे निवेदन असल्याचे दिसून आले. कोरोना रुग्ण संख्या कशी कमी होणार, याचा ठोस कार्यक्रम सरकारकडे नसल्याचे दिसून येते. अशी टीका भाजपचे माध्यम प्रमुख विश्वास पाठक यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केले आहे. यात मुख्यमंत्री महोदय ५ हजार कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज देत असल्याची घोषणा करतात. मात्र, हा आकडा महाराष्ट्राच्या जीडीपीच्या एक टक्के देखील होत नाही. केंद्र सरकारने जीडीपीच्या १० टक्के आर्थिक पॅकेज जाहीर केल्यानंतर तुम्ही त्यांच्यावर टीका केली होती. मग आता तुम्ही तर एकच टक्के आर्थिक पॅकेज देत आहात, यावर देखील पाठक यांनी टीका केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला जेवढ्या कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज दिले, तेवढे पैसे तर आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या सदनीका दुरुस्त करण्यासाठी दिले आहेत. आज मुख्यमंत्र्यांनी कोरोना रुग्ण कसे कमी होतील, यावर काहीही ठोस उपाय केलेले नसल्याची टीकाही त्यांनी केली. एकूण आजच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनंतर आणखी गोंधळाची स्थिती निर्माण झाली असल्याचे ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!