मुंबई : महाविकास आघाडीचे राज्यातील सरकार हे राजपुत्रांनी राजपुत्रांसाठी चालवलेलं सरकार असल्याचा आरोप भाजप आमदार राम सातपुते यांनी यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी आदित्य ठाकरे आणि खासदार सुप्रिया सुळे यांना टॅग करुन टीका केलीय. महापोर्टलवरुन भाजपच्या वतीने राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहे. त्यातच राम सातपुते यांनी अशा प्रकारे टीका केलीय.
ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर फडणवीस सरकारच्या कार्यकाळातील अनेक निर्णय रद्द ठरवले होते. त्यात महापोर्टल बंद करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्याच बरोबर लवकरच नवे पोर्टल आपण सुरू करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, एका वर्षानंतरही नवे पोर्टल सुरू झालेले नाही. त्यामुळे भाजपच्या वतीने ठाकरे सरकारवर टीका करण्यात येत आहे.
महापोर्टल मार्फत परीक्षा घेण्याचा निर्णय रद्द तर केला पण पुढे काय?? सत्ताधारी पक्षाचे बगलबच्चे पोसण्यासाठी गोरगरीब विद्यार्थ्यांच्या भावनांशी कधीपर्यंत खेळणार? हे राजपुत्रांनी राजपुत्रांसाठी चालवलेलं सरकार आहे. @supriya_sule @AUThackeray
— Ram Satpute (@RamVSatpute) July 12, 2021
या संदर्भात आमदार राम सातपुते यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महाविकास आघाडी आणि ठाकरे सरकारवर टीका केलीय. ते म्हणाले की, ‘महापोर्टल मार्फत परीक्षा घेण्याचा निर्णय रद्द तर केला पण पुढे काय?? सत्ताधारी पक्षाचे बगलबच्चे पोसण्यासाठी गोरगरीब विद्यार्थ्यांच्या भावनांशी कधीपर्यंत खेळणार? हे राजपुत्रांनी राजपुत्रांसाठी चालवलेलं सरकार आहे.’
महत्त्वाच्या बातम्या
- पावसामध्ये सेल्फी घेणे पडले महागात; वीज कोसळल्याने 11 जण पडले मृत्यूमुखी
- ‘शाळा अद्याप सुरू करू नयेत, कारण…’ ; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची भूमिका
- महाराष्ट्रात आज कोरोनाचे ८ हजार ५३५ नवे रुग्ण तर ‘इतके’ रुग्ण कोरोनामुक्त
- ‘नागरिकांनी ‘या’ अफवांवर विश्वास ठेवू नये’, मंत्री अशोक चव्हाण यांचे आवाहन
- लोकसंख्येचा विस्फोट होत असेल तर कायदा गरजेचाच – देवेंद्र फडणवीस


