Share

लोकसंख्येचा विस्फोट होत असेल तर कायदा गरजेचाच – देवेंद्र फडणवीस

Published On: 

🕒 1 min read

नागपूर – उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधत लोकसंख्या धोरण जाहीर केले. यामध्ये परिवार नियोजन करण्यासह अनेक योजना राबाविण्याचा विचार सुरू असून एक मुल झाल्यानंतर नसबंदी केल्यास त्यांना 20 वर्षापर्यंत मोफत आरोग्य सुविधा, शिक्षण, विमा, यासोबत शासकीय नोकरित प्राधान्य असे अनेक लाभ या लोकसंख्या धोरणाच्या माध्यमातून देणार असल्याचे या धोरणात म्हटले आहे.

योगींनी घेतलेल्या या निर्णयावर देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत. यातच आता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपले मत व्यक्त केले आहे. लोकसंख्येचा विस्फोट झाला आहे अशा राज्यांमध्ये लोकसंख्येवर आळा घालण्यासाठी कायदा करणं आवश्यक असून गरज असल्यास देशातही अशा प्रकारचा कायदा लागू झाला पाहिजे असं मत फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.

नागपुरात जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त काल ते बोलत होते. आपल्या देशातील लोकशाहीच्या आधारावर नागरिकांना काही सवलती देऊन अशा कायदयाची अंमलबजावणी केली पाहिजे असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. लोकसंख्या नियंत्रणात असणे गरजेचे आहे. आपण लोकशाही देशात राहतो. देशातील लोकसंख्या वाढीला रोखण्यासाठी प्रोत्साहन म्हणून कायदा लागू केल्यास नक्कीच याचा फायदा होईल असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!