टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला लागलेली गळती काही केल्या थांबायला तयार नाही. आतापर्यंत अनेक नेत्यांनी पक्षांतर केले आहे तर अनेक नेते भाजप आणि शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.
अशातच श्रीरामपूरमध्ये कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. विद्यमान आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. भाऊसाहेब कांबळे हे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुंबईत ४ सप्टेंबरला उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती कांबळेंचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, भाऊसाहेब कांबळे यांना कॉंग्रेसने लोकसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. परंतु या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. शिवसेनेच्या सदाशिव लोखंडे यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या आधी कांबळे यांनी शिवसेनेची वाट धरली आहे.
दरम्यान, यापूर्वी शिवसेनेत अनेक नेत्यांनी प्रवेश केला आहे. त्यात रश्मी बागल, दिलीप सोपल, दिलीप माने यांचा समावेश आहे. तसेच राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळही शिवसेनेच्या वाटेवर आहेत.
- ‘सुळे निवडून आल्या तर इव्हीएम चांगलं आणि मुंडेंच्या मुली जिंकल्या तर मशीन खराब’
- भाजपात आले तरी राणा पाटलांना विधानसभा निवडणुकीत धोकाचं !
- ‘मुख्यमंत्री आरशासमोर उभे राहिल्यास त्यांना विरोधी पक्षनेता दिसेल’
- ‘कर्जमाफी नको! तर कर्जमुक्ती हवी, शेतकरी गुन्हेगार आहे का ?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

