🕒 1 min read
औरंगाबाद : भाजपने काढलेल्या जन आशीर्वाद यात्रेला संपूर्ण महाराष्ट्रात मोठा प्रतिसाद मिळाला. जनतेशी संवाद साधत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेली कामे जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात भाजपला या माध्यमातून यश आले. याच कारणामुळे महाविकास आघाडीच्या पोटात दुखत आहे. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोदी सरकारने मंत्रिमंडळात स्थान दिले. सूडबुद्धीने तसेच मनात आकस ठेवून ही कारवाई करण्यात आल्याची टीका वैजापूर येथील भाजप कार्यकर्त्यांनी केली.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेच्या निषेधार्थ वैजापूर शहरातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी वैजापूर शहर बंद करण्याचा प्रयत्न केला. होता परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव बघता त्यांनी हा निर्णय मागे घेऊन निदर्शने केली. नगराध्यक्ष डॉ दिनेश परदेशी, जिल्हा उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष कैलास पवार, किसान सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जगतापसह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जी अटक झाली त्या निषेधार्थ वैजापूर शहरातील भाजप कार्यकर्त्यांनी जाहीर निदर्शने केली.
संपूर्ण महाराष्ट्रात निघालेल्या जन आशीर्वाद यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्यामुळे महाविकास आघाडीच्या पोटात दुखत आहे. त्यामुळे त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केली. असे उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष कैलास पवार यांनी सांगितले. नारायण राणे हे केंद्रात मंत्री झाल्यापासून महाविकास आघाडी यांनी आकसापोटी आणि सूडबुद्धीने हा अटकेचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील भाजपाचे कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असे जिल्हा सहकार विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जगताप यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- काही जण माझ्या मैत्रीचा आणि चांगुलपणाचा फायदा उचलतात हे आता लक्षात आलंय-नारायण राणे
- ‘ “त्या” वेळीही उद्धव ठाकरेंनी राणेंविरोधात षडयंत्र केलं होतं; आताही त्यांच्या पोटात दुखतंय’
- बापाबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या ‘राणे’ला शिक्षा झालीच पाहिजे – आ. रमेश बोरनारे
- ‘नारायण राणेंचं एन्काऊंटर करणार’, शिवसेना नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य
- कल्याणसिंह : राम मंदिरासाठी सत्तेचा त्याग करणारे उत्तम शासक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
