औरंंगाबाद : रांजणगाव परिसरातील राधानगरी येथील गॅरेजचा पत्रा उचकटून चोरट्यांनी ३५ हजार रूपये किंमतीचे समान चोरी केल्याची घटना घडली. त्यामुळे शहरात चोरट्यांचा पुन्हा धुमाकूळ पहायला मिळत असल्याची चर्चा आहे.
राधानगरी भागात निलेश गोरे यांचे गॅरेज आहे. शुक्रवारी ते नित्याप्रमाणे काम आटपून दुकान बंद करून घरी गेले. त्यानंतर दोन दिवस दुकान बंद राहणार असल्याने त्यांनी दुकानाची तपासणी देखील केली. परंतु शुक्रवारी रात्री चोरट्यांनी टायर, ऑईलचे डब्बे, चैनकव्हर,हेडलाईट,ब्लॉक-पिस्टन आदी चोरून नेले.
ही घटना २ जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी निलेश गोरे (वय २७,रा.ताळपिंपळगाव,ता.कन्नड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून चोरट्याविरूध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘केंद्राचा कृषी कायदा शेतकऱ्यांसाठी अडचणीचा, आम्ही दुसरा आणणार’
- ‘स्वप्निलची आत्महत्या नव्हे, हा तर ठाकरे सरकारने केलेला मर्डर आहे!’
- ‘..अन्यथा हेच तरूण तुमच्या गळ्याला फास लावतील’, राजू शेट्टींचा ठाकरे सरकारला इशारा
- ‘अधिवेशन कसे चालवायचे हे आता संज्या सांगणार, इतके खराब दिवस आलेत महाराष्ट्राचे’
- मुख्यमंत्री होऊ न देण्याचे ओवेसींचे आव्हान योगींनी स्वीकारले, म्हणाले..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

