औरंंगाबाद : घराला कुलूप लावून कुटुंबियासह बाहेरगावी गेलेल्या सुदाम दगडू वाघ (वय ४८,रा.पटेलनगर,चिकलठाणा) यांचे घर फोडून चोरट्याने २० हजाराचा ऐवज चोरून नेला. ही घटना २७ जून ते ३ जुलैदरम्यान घडली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर दुसऱ्या घटनेत हर्सुल परिसरात असलेले मोबाईल रिपेरिंगच्या दुकानाचे पाठीमागील पत्रा उचकटून चोरट्यांनी २३ हजाराचा ऐवज चोरून नेला. ही घटना २ जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी तबरेज समशेर खान (वय २४,रा.हर्सुल) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हर्सुल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच टिळकपथ रोडवरील कॉटनकिंग दुकानासमोर मोबाईलवर बोलत उभे असलेले नवनाथ सुर्यभान बोडखे (वय ४०,रा.औरंगपुरा) यांचा ६ हजार रूपये किंमतीचा मोबाईल चोरट्यांनी हिसकावून नेला. ही घटना १ जुलै रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘केंद्राचा कृषी कायदा शेतकऱ्यांसाठी अडचणीचा, आम्ही दुसरा आणणार’
- ‘स्वप्निलची आत्महत्या नव्हे, हा तर ठाकरे सरकारने केलेला मर्डर आहे!’
- ‘..अन्यथा हेच तरूण तुमच्या गळ्याला फास लावतील’, राजू शेट्टींचा ठाकरे सरकारला इशारा
- ‘अधिवेशन कसे चालवायचे हे आता संज्या सांगणार, इतके खराब दिवस आलेत महाराष्ट्राचे’
- मुख्यमंत्री होऊ न देण्याचे ओवेसींचे आव्हान योगींनी स्वीकारले, म्हणाले..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

