🕒 1 min read
मुंबई: शिवसेनेच्या २५ आमदारांनी निधीबाबत होत असलेल्या अन्यायाविरुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दोन दिवसांपूर्वी भेट घेतली आणि त्यांना सांगितले की, निधीवाटपाबाबत आमच्यावर अन्याय होत आहे. निधी मिळाला नाही तर आम्ही अर्थसंकल्पाच्या वेळी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकू. यामुळे राजकीय वातावरणात एकच खळबळ उडाली आहे. यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर (Criticism of Atul Bhatkhalkar) यांनी निशाणा साधला आहे.
“निधी मिळणार नसेल तर आम्ही अर्थ संकल्पावर बहिष्कार घालू असा पवित्रा शिवसेनेच्या २५ आमदारांनी घेतल्याचे वृत्त आहे. राष्ट्रवादीने अर्थ खाते कायम आपल्याकडे राहील याची प्रत्येक आघाडी सरकार मध्ये काळजी घेतली आहे त्याचा हा अर्थ आहे. हे सरकार २५ वर्षे टिकणार आहे म्हणे.”, असा खोचक टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.
निधी मिळणार नसेल तर आम्ही अर्थ संकल्पावर बहिष्कार घालू असा पवित्रा शिवसेनेच्या २५ आमदारांनी घेतल्याचे वृत्त आहे.
राष्ट्रवादीने अर्थ खाते कायम आपल्याकडे राहील याची प्रत्येक आघाडी सरकार मध्ये काळजी घेतली आहे त्याचा हा अर्थ आहे.
हे सरकार २५ वर्षे टिकणार आहे म्हणे. pic.twitter.com/QvHsnAwlLB— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 7, 2022
दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जे प्रस्ताव अर्थसंकल्पीय तरतुदीसाठी देण्यात आले आहेत त्यात काँग्रेसच्या आमदारांच्या मतदारसंघांसाठी ९०० कोटी, राष्ट्रवादीच्या आमदारांच्या मतदारसंघांसाठी ७०० कोटी तर शिवसेना आमदारांच्या मतदारसंघांसाठी केवळ ३०० कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. यावरूनच या आमदारांमध्ये नाराजी असल्याचे म्हटले जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
“…तर अजित पवारांना फासावर लटकवणार का”, देवेंद्र फडणवीसांचा संतप्त सवाल
-
“वैराग्याच्या काळातही बगल में छुरी…”; गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर खोचक टीका
-
मुलाला मिळेना बॉलीवूडमध्ये काम; म्हणून ही मराठी अभिनेत्री आहे चिंतेत !
-
वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडचा संघ जाहीर, तर ‘या’ दिग्गजांना दिला डच्चू
- “चप्पल भिरकावणं ही महाराष्ट्राची पद्धत नक्कीच नाही”, ‘त्या’ घटनेवर रोहित पवारांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
