मुंबई: सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आक्रमक झाल्याचे आज (७ मार्च) दिसून आले. विधानभवनात बोलताना त्यांनी आमदार रवी राणा तसेच अमरावती मनपा आयुक्तांवर शाईफेकीच्या घटनांवरून राष्ट्रवादीवर निशाणा साधला.
“अमरावती मनपा आयुक्तांवर शाईफेकीची घटना घडली तेव्हा रवी राणा दिल्लीत होते. तरी पोलिसांनी रवी त्यांच्यावर कलम ३०७ आणि कलम ३५३ सारख्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. ही घटना अत्यंत चूक आहे. पण गु्न्हेगाराशी संबंध नसताना शिक्षा दिली जात आहे. उद्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काही केलं तर मग अजितदादांना (Ajit Pawar) फासावर देणार का?”, असा संतप्त सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.
तसेच रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी अमरावतीच्या पोलीस आयुक्तांना कोणत्या नेत्यांचे फोन गेले? रवी राणा यांच्यावर ३०७ गुन्हा दाखल झाला. तर शाईफेक करणाऱ्यांवर तितके गंभीर गुन्हे दाखल झाले नाहीत. त्यामुळे पोलिसांकडून ३०७ चा गैरवापर सुरु असून याने पोलीस बेछूट होतील. आम्हाला गोंधळ करण्यात काहीही इंटरेस्ट नाही. काही तरी आश्वासन द्या. विधानसभा सदस्यावर अन्याय झाला, काही तरी आश्वासन मिळायला हवं, अशी मागणीही फडणवीस यांनी विधानभवनात केली.
महत्वाच्या बातम्या :
- थायलँड पोलिसांकडून नवीन खुलासा; शेन वॉर्नच्या रूममध्ये रक्ताचे डाग आढळले
- “मैदानावरची स्पर्धा मैदानाबाहेर नसते”, जितेंद्र आव्हाडांनी केले भारतीय महिला क्रिकेटर्सचे कौतुक
- वाटले नव्हते की एवढ्या लवकर सामन्याचा निर्णय लागेल, श्रीलंकन दिग्गजाचे वक्तव्य
- “…पण तुम्हाला आजपर्यंत राष्ट्रवादीचा मुख्यमंत्रीही बसवता आला नाही”, पडळकरांचा खोचक टोला
- “चप्पल भिरकावणं ही महाराष्ट्राची पद्धत नक्कीच नाही”, ‘त्या’ घटनेवर रोहित पवारांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

