🕒 1 min read
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. जवळपास तासभर या दोन्ही नेत्यांची चर्चा झाली. पण त्यामध्ये नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याविषयी अद्याप निश्चित माहिती मिळू शकलेली नाही.
मात्र, या भेटीवरून राज्यात विविध तर्कांना उधाण आले आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी या भेटीमागचे गुपित सांगितले आहे. नागरी आणि सहकारी बँकांवर रिझर्व बँकेने आणलेल्या निर्बंधांच्या बाबत ही भेट झाल्याचे स्पष्टीकरण जयंत पाटलांनी दिले. पण तरीही राजकीय विश्लेषकांना ही भेट वेगळ्या कारणामुळेच झाली असावी असे वाटते.
दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही या भेटीवर भाष्य केले आहे. एका वृत्तवाहिणीशी संवाद साधताना दरेकर म्हणाले की, ‘शरद पवार हे मोठे नेते आहेत. त्यामुळे ते मोदींना भेटणे स्वाभाविक आहे. पण महाराष्ट्रातील तीन पक्षाचं तीन दिशेला तोंड आहे. त्यामुळे पवार व्यथितही असतील. महाराष्ट्राचा विकास पुढे जात नाही या कल्पनेमुळे ते व्यथित असतील. अशावेळी मोदींसोबत चर्चा करावी असे त्यांना वाटले असेल.’
‘राजकीय पक्ष कोणताही असला तरी आपल्या राज्याचा विकास करणे हाच प्रत्येक पक्षाचा अंतिम ध्यास असतो. पण पवार मोदींना भेटायला गेले म्हणजे ते नुसत्या हवापाण्याच्या गोष्टी करणार नाहीत. राजकीय चर्चा तर होणारच’, असा दावा त्यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘..तर मग ‘त्या’ बार मालकांची साधी चौकशीही का केली नाही?’, काँग्रेसचा ईडीला सवाल
- ‘आता काय सुप्रीम कोर्टही देशद्रोहींसोबत आहे का?’ काँग्रेस नेत्याचा मोदींना खोचक सवाल
- ‘राज्यपालांनी हेवेदावे विसरून १२ आमदारांची नेमणूक करावी’, राज्य सरकारचे आवाहन
- मोठी बातमी! शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांची दिल्लीत भेट
- ‘पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती शुद्ध देशी तुपापेक्षाही महाग’, काँग्रेसचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
