मुंबई: दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवास करण्यास परवानगी दिली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली. यानंतर मुंबईकरांतून मोठा उत्साह पहावयास मिळाला. मात्र कोरोन लस घेतलेल्यांना लोकल प्रवास करूच दिला जाणार नसल्याचे मुंबई पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी स्पष्ट केले.
दरम्यान येत्या १५ ऑगस्टपासून लोकल सुरु होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली आहे. मात्र, ही सुविधा फक्त दोन डोस घेतलेल्यांसाठी आणि त्याला १४ दिवस पूर्ण झाले असलेल्यांसाठीच उपलब्ध असेल. यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही पद्धतीचे पास मिळतील. अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
दरम्यान दोन डोस घेतलेल्या नागरिकांना मॉल, रेस्टॉरंटमध्येही प्रवेश देण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे लसीकरणासाठी पुढाकार घेण्याचे आव्हान मुंबईचे पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी केले आहे. लसीकरण सर्टिफिकेटवरील नंबरच्या आधारे ऑनलाईन पासची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. लोकांची गैरसोय होवू नये, यासाठी वॉर्ड ऑफिसमध्येही ऑफलाईन पद्धतीने पास मिळतील. अशी माहिती त्यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सगळं केंद्राने द्याव मी फक्त घरात बसणार, नाहीतर मर्सिडीज चालवणार’; भाजपची टीका
- 102 व्या घटना दुरुस्तीत बदल करणारे विधेयक सरकार आज लोकसभेत मांडणार
- पुण्यातील निर्बंध शिथिल केल्यानंतर आता सोलापुरातील निर्बंध शिथिल करण्याची होतेय मागणी
- मराठा आरक्षण : पुण्यात आज राज्यस्तरीय बैठक; संभाजीराजेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
- वाढदिवसाच्या मिरवणुकीत तलवार नाचवली,अबू आझमींसह कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

