मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi) भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषेदेत पवारांनी अनेक मुद्द्यावर भाष्य केले आहे. तसेच यावेळी राज ठाकरेंसंदर्भांत बोलतांना ‘राज ठाकरे आधी मोदींच्या विरोधात होते, आता ते बदलले आहेत. पण राज ठाकेरेंच्या बोलण्याकडे मी लक्ष देत नाही’, असे पवार म्हणाले. दरम्यान, पवारांच्या या वक्तव्यावर आता भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी टीका केली आहे.
यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘राज ठाकरे आधी भाजपविरोधात होते, त्यांच्या भाषणात बदल का झाला याचं कारण कळलं नाही, असे शरद पवार म्हणाले. आधी तुम्ही सोनिया गांधींच्या विदेशी मुद्द्यावर काँग्रेसच्या विरोधात होतात, नंतर तुमच्या भूमिकेत बदल का झाला याचं कारण कधीच कळलं नाही’, असे भातखळकर म्हणाले.
दरम्यान, ‘संजय राऊत यांच्या मालकीची केवळ अर्धा एकर जमीन अलिबागमध्ये आहे. अशा क्षुल्लक कारणासाठी एका ज्येष्ठ पत्रकारावर केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाई करणे योग्य नाही’, असेही काल पत्रकारांशी संवाद साधत असतांना शरद पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- “जनतेने मतं देऊन त्यांची जबाबदारी पूर्ण केली आता आपल्याला…”, अजित पवारांचे मोठे वक्तव्य
- शहरप्रमुख पदावरुन हटवल्यानंतर वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रिया! म्हणाले “आरे मी तर कधी पासूनच…”
- सत्ताधाऱ्यांना सणसणीत उत्तर देण्यासाठी राज ठाकरेंची होणार ‘उत्तर’सभा
- IPL 2022 : एक ओव्हर आणि ३५ रन्स..! मुंबईच्या गोलंदाजाला कमिन्सनं धुतलं; पाहा तुफानी बॅटिंगचा VIDEO!
- “…ही अन्यायकारक दरवाढ मागे घ्या”, काँग्रेसची मागणी


