🕒 1 min read
मुंबई: सध्या राज्यात दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरु आहेत. यातच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठी घोषणा केली आहे. परीक्षेदरम्यान पेपरफुटीची प्रकरणे आढळून आल्यास त्या शाळांची मान्यता काढून घेतली जाणार आहे. तसेच कॉपीचे प्रकार आढळले तर यापुढे त्या शाळांना परीक्षा केंद्र दिलं जाणार नाही अशी घोषणा वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
“१५ मार्चला दहावीच्या मराठीची परीक्षा होती. कोरोना स्थिती पाहता आपण प्रत्येक शाळेला परीक्षा केंद्र केलं. ज्या शाळेत गैरप्रकार सुरु असल्याचे दिसून आले त्यांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे असे काही प्रकार होत असतील तर परीक्षे केंद्र रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे”, अशी माहिती वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिली आहे.
दरम्यान राज्यातील अहमदनर आणि औरंगाबादमध्ये पेपरफुटीचे प्रकरण आढळून आलेल्या शाळांची मान्यता काढून घेण्यात आल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत बोलताना दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- IPL 2022: जिमी नीशमने आयपीएलच्या नवीन नियमांबाबत दर्शवली नाराजी; चाहत्यांनी ट्विटरवर झापले
- नवज्योत सिंग सिद्धूंनी दिला पंजाब कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा
- देशात पुन्हा कोरोनाची धास्ती; आरोग्यमंत्र्यांनी घेतली उच्चस्तरीय बैठक
- बाबर आझमने रचला इतिहास; डॉन ब्रॅडमन , कोहलीलाही मागे सोडले!
- “विदर्भाचा बॅकलॉग भरून काढण्याची संधी भाजपने गमावली”- नाना पटोले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
