Share

‘ “तेव्हा” देखील अशाच कटुतेनंतर पुन्हा भाजप-शिवसेना युती झालेली’; चंद्रकांतदादांच सूचक विधान

Published On: 

पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दोन दिवसांपूर्वी जन आशीर्वाद यात्रेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. महाड, नाशिकसह पुण्यात राणेंविरोधात गुन्हा दाखल झाला असून राणे यांना काल पोलिसांनी अटक देखील केली होती. तर, मंगळवारी सकाळपासूनच शिवसेना-भाजपमध्ये राडा सुरु झाल्याचं पाहायला मिळालं होतं.

राणेंना मंगळवारी दुपारी संगमेश्वर येथे अटक करण्यात आली. त्यानंतर रात्री नऊच्या सुमारास पोलीस राणे यांना घेऊन महाड येथे दाखल झाले. रात्री उशिरा त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केल्यानंतर समर्थकांनी एकच जल्लोष केला. दरम्यान, अद्यापही हा वाद कायम आहे. काही महिन्यांपूर्वी सेना भवन येथे भाजप कार्यकर्ते आणि शिवसैनिकांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर दोन्ही पक्षातील संघर्ष वाढलेला असतानाच गेल्या २ दिवसातील राड्यामुळे सेना-भाजप अधिक दुरावल्याचं दिसून येत आहे.

अशा वातावरणातही भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी भाजप-शिवसेना युतीबाबत सूचक विधान केला आहे. ‘मी भविष्यकार नाही पण सेना-भाजपमध्ये अशीच कटुता २०१४ साली होती. युती तुटल्यानंतर एकमेकांना खूप शिव्या दिल्या गेल्या. पण नंतर युतीचं सरकार स्थापन झालं. बरोबर कि चूक ते माहित नाही. आता काँग्रेस-राष्ट्रवादीवाले हसून मजा घेत आहेत. पण काही वेगळंही होऊ शकतं,’ असं विधान चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेतून केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!