Share

…तर महाराष्ट्रातही बंगालसारखी स्थिती निर्माण होईल- विजय वडेट्टीवार

Published On: 

नागपूर : दोन वर्षांपासून कोरोनामुळे (Corona) जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेले काही महिने कोरोनाला ब्रेक लागला होता. परिस्थिती पूर्वपदावर येत होती. परंतु आता कोरोनाच्या नव्या विषाणुने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमायक्रॉन’ (Omicron) हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. असे असतांनाच पश्चिम बंगालमध्ये मिनी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही वाढत्या रुग्णसंख्येमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) पश्चिम बंगाल सरकारने जो निर्णय घेतला तसाच निर्णय मुख्यमंत्री घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

याच पार्श्वभूमीवर राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar) यांनी यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधला असून यावेळी बोलत असतांना ते म्हणाले की,’पश्चिम बंगालमध्ये मिनी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. जर राज्यातही कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर महाराष्ट्रातही बंगालसारखी स्थिती निर्माण होईल. पश्चिम बंगाल सरकारने जो निर्णय घेतला, तसाच निर्णय मुख्यमंत्री लवकरात लवकर घेण्याची शक्यता आहे. ती चर्चाही झाली आहे’, असे वडेट्टीवार म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’ जर राज्यात लॉकडाऊन लागले तर काही ठिकाणी कंटेन्मेंट झोन तयार करून प्रवेश बंदी करण्यात येईल. तसेच रेल्वे, शाळा बंद करण्याचा निर्णय लॉकडाऊनमध्ये होत असतात. मात्र,निर्णय कधी घ्यायचा याबाबत कॅबिनेटमध्ये चर्चा होईल.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!